Rahul Gandhi Walks With Tushar Gandhi,भारत जोडो यात्रेत नवा इतिहास, गांधी-नेहरु परिवार एकत्र, महात्मा गांधींचे पणतू सहभागी – maharashtra political news bharat jodo yatra in akola rahul gandhi walks with tushar gandhi jawaharlal nehru mahatma gandhi new generations together
Rahul Gandhi Walks With Tushar Gandhi,भारत जोडो यात्रेत नवा इतिहास, गांधी-नेहरु परिवार एकत्र, महात्मा गांधींचे पणतू सहभागी – maharashtra political news bharat jodo yatra in akola rahul gandhi walks with tushar gandhi jawaharlal nehru mahatma gandhi new generations together
Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा विदर्भात पोहोचली आहे. यावेळी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या परिवारातील चौथी पिढी अकोल्यात एकत्र दिसली.
हायलाइट्स:
काँग्रेसची भारत जोडो यात्रा अकोल्यात
महात्मा गांधींचे पणतूही सहभागी
तुषार गांधी-राहुल गांधी एकत्र यात्रेत
राहुल गांधी-तुषार गांधी भारत जोडो यात्रेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) एक नवा इतिहास रचला गेला. महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) आणि पंडित जवाहरलाल नेहरु ( Jawaharlal Nehru ) यांच्या विचारधारा वाहणारे दोन शिलेदार हातात हात घालून एकत्र चालत असल्याचे दृश्य अकोल्यात पाहायला मिळाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) भारत जोडो यात्रेत एकत्र चालले.
महाराष्ट्रात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा विदर्भात पोहोचली आहे. यावेळी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या परिवारातील चौथी पिढी अकोल्यात एकत्र दिसली. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी हे पंडित जवाहरलाल नेहरु यांचे पणतू राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.
जणू काही स्वातंत्र्य लढ्याची पुनरावृत्ती होत आहे, अशा भावना व्यक्त केल्या गेल्या. तुम्ही लोकशाही धोक्यात आणू शकता, पण आम्ही ती नष्ट होऊ देणार नाही, असा संदेश सरकारला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
देशावर इंग्रजांची हुकूमशाही वाढत असताना गांधी नेहरु बाहेर पडले होते, आपल्या देशवासीयांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले होते, आज राहुल गांधीही तेच करत असताना तुषार गांधीही त्यांच्या साथीला आले, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं.
दुसरीकडे, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वाद उफाळून आला आहे. भाजप, मनसे यांनी राज्यभर आंदोलन छेडलं आहे. तर शिवसेनेने कालच त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगत हात झटकले होते. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी या कारणावरुन महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा सूचक इशाराही दिला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा