Prasad Oak : प्रसाद ओकनं ‘देऊळ बंद २’च्या यशाचं कौतुक केलं असून प्रवीण तरडे यांचंही कौतुक केलं आहे.

Pravin Tarde दिग्दर्शित देऊळ बंद २ ची टीम कोल्हापुरात, देवीला काय घातलं साकडं?
प्रसाद ओकनं केलं सिनेमाचं कौतुक
प्रसाद ओक म्हणाला की, ‘नमस्कार! ‘देऊळ बंद २’ या आमच्या चित्रपटाननं १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ही अत्यंत आनंदाची आणि प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. यानिमित्तानं माझे मित्र आणि या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचं मी अभिनंदन केलं पाहिजे, असं मला मनापासून वाटलं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातून ‘देऊळ बंद २’ चित्रपटाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमा प्रदर्शित होऊन ४० दिवस उलटून गेलेत आणि अजूनही अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. एकंदर मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आलेले आहेत. ‘राजा शिवाजी’, त्यानंतर आमच्या सईचा, जितेंद्रचा सिनेमा आला त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. अशाचप्रकारे ‘देऊळ बंद २’ सुद्धा सुपरहिट ठरला आहे. त्यामुळे प्रवीण तरडे या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजपर्यंत या माणसाला सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही प्रसन्न होत्याच. आता त्याच्या पाठिशी स्वामी सुद्धा ठामपणे उभे आहेत. त्यामुळे आमच्या प्रवीण तरडेला कसलीच चिंता नाही. आता पुढची ५० वर्षे तरी तो मागे वळून बघणार नाही, एवढं नक्की!’
Shreyas Talpade : ‘मी होम लोनसाठी पात्र नव्हतो’, पहिलं घर घेण्यासाठी शाहरुखने श्रेयस तळपदेला केलेली मदत, अभिनेत्यानं सांगितला किस्सा
‘प्रवीणने खूप हालअपेष्टा सहन करून हा चित्रपट बनवला होता. माझाही या सिनेमात खारीचा वाटा आहे, त्यामुळे या सिनेमासाठी त्याने काय-काय सोसलंय, पावसामुळे त्याचं किती नुकसान झालंय, त्याला बरेच दिवस शूटिंग थांबवावं लागलं होतं. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे ज्या परिस्थितीतून प्रवीणने हा सिनेमा पूर्ण केलाय, त्यासाठी त्याचं खूप कौतुक करायला हवं. कदाचित यामुळेच हा चित्रपट आज एवढं यश पाहतोय. कारण, प्रवीणने अत्यंत प्रामाणिकपणे स्वामींवर संपूर्ण निष्ठा ठेऊन हा चित्रपट बनवला. त्याचाच प्रत्यय आज आम्हाला सर्वांना येतोय.’
‘अजून एक खास आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे, आमच्या पिढीतले जे कोणी दिग्दर्शक आहेत, त्यात माझ्या माहितीतला प्रवीण हा एकमेव असा दिग्दर्शक आहे, ज्याचे बॅक टू बॅक सगळे चित्रपट सुपरहिट झालेत. ‘देऊळ बंद’च्या पहिल्या भागापासून त्याचा प्रवास सुरू झाला. मग, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’ आणि आता ‘देऊळ बंद २’ खरंतर यामध्ये ‘फुलवंती’ सुद्धा पकडला पाहिजे पण, तो आमच्या स्नेहलने दिग्दर्शित केला होता. पण, प्रवीणचाही त्यात लेखक म्हणून वाटा होता. त्याच्या झोळीत आज हे एवढे सगळे यशस्वी सिनेमे आहेत, त्याबद्दल त्याचं खूप कौतुक!’
Sunil Lahri : ‘वाईट कृत्य, भक्तांच्या श्रद्धेचा मोठा विश्वासघात’, अयोध्या राम मंदिराच्या देणगी घोटाळ्यावर संतापले ‘रामायण’ फेम ‘लक्ष्मण’
‘प्रवीण, प्रत्येक सिनेमावर तू किती मेहनत घेतोस, किती काम करतोस, हे मी ‘धर्मवीर’पासून फार जवळून पाहिलंय. या चित्रपटाच्यावेळी सुद्धा तू तेवढेच कष्ट घेतलेस. रात्रभर जागा राहिला असशील. म्हणूनच स्वामींनी आज तुझ्या पदरात एवढं मोठं यश दिलं आहे. प्रवीण मित्रा, असंच काम करत राहा, तू स्वत:चा हक्काचा प्रेक्षकवर्ग तयार केला आहेस आणि याचा इंडस्ट्री म्हणून मला प्रचंड अभिमान आहे. ‘देऊळ बंद २’च्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन! मराठी प्रेक्षकांचेही आभार…तुम्ही पाठिंबा दिलात म्हणूनच हे सगळं शक्य झालं आहे.’ असं म्हणत प्रसादने सर्वांचं कौतुक केलं आहे.

