परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत संचालक मंडळात सर्व राजकीय नेत्यांशी संबंधित उमेदवार जिंकून आले आहेत. विशेष म्हणजे आजी-माजी आमदारांच्या घरातील तब्बल 5 जण जिंकून आले आहेत. त्यामुळे राजकीय घराणेशाहीची चर्चा सुरु आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील पाच विद्यमान आमदार निवडून आले आहेत. यामध्ये मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार सईद खान, आमदार राजू नवघरे यांचा समावेश आहे. तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपूडकर आणि माजी आमदार सुरेश देशमुख हे देखील निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे सुरेश वरपूडकर आणि रामप्रसाद बोर्डीकर यांच्याच घरातील तब्बल पाच उमेदवार या संचालक मंडळात निवडून आल्याने परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळामध्ये आजी-माजी आमदारासह घराणेशाहीला ऊत आल्याचे दिसून आले आहे. या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना कसल्याही प्रकारची इंट्री मिळू नये याची खबरदारी मात्र या सर्वच पुढार्यांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वसामान्यांसाठी आहे की पुढार्यांसाठी आहे? असा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे.
13 जागा बिनविरोध, 8 जागांवर निवडणूक
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालक पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली. यानंतर आज मतमोजणीनंतर निकाल देखील लागला आहे. बँकेच्या 21 पैकी तब्बल 13 जागांवर संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित केवळ आठ जागांसाठी काल रविवारी मतदान प्रक्रिया संपन्न झाली आणि आज मतमोजणी देखील संपन्न झाली.
या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी आमदार सुरेश वरपूडकर या दोघांनी मिळून आपला पॅनल निवडणूक रिंगणात उभा केला होता. त्यामुळे बहुतांश जागांवर बिनविरोध होण्याची प्रक्रिया संपन्न झाली होती. केवळ आठ जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये देखील या दोघांच्या पॅनललाच भरभरून यश मिळाले आहे.
घराणेशाहीची चर्चा
असं असलं तरी चर्चा मात्र या बँकेमध्ये निवडून आलेल्या संचालकांचीच होत आहे. परभणी, हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घराणेशाहीला ऊत आल्याचे देखील दिसून आले आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या घरतील तब्बल तीन जण या बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले आहे.
रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासोबत मुलगी आमदार मेघना बोर्डीकर तर दुसरी मुलगी भावना बोर्डीकर या संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासोबत त्यांची सुनबाई प्रेरणा वरपूडकर यादेखील मध्यवर्ती बँकेच्या संचालिका म्हणून निवडून आले आहेत.
हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात कुटुंबातील राजामती मुटकुळे यादेखील मध्यवर्ती बँकेमध्ये निवडून आले आहेत. तर हिंगोलीचे भैय्या पाटील गोरेगावकर यांच्या घरातील देखील तिघेजण जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून आलेले आहेत. त्यामुळे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक ही घराणेशही चालवत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.
आमदार सईद खान यांनी एकाकी झुंज देत विजय खेचून आणला
आजी-माजी आमदारांसह घराणेशाहीला ऊत आलेल्या या परभणी हिंगोली मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार असलेल्या आमदार सईद खान यांनी मात्र चुरशीची लढत देत आपला विजय खेचून आणला आहे.
मागचंबरांच्या पॅनल समोर अपक्ष उमेदवारी अर्ज भरत सईद खान यांनी सुरुवातीपासूनच इतर मतदारसंघांमध्ये चांगलीच चुरस निर्माण केली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय जामकर यांचे कडवे आव्हान त्यांना होते. पण असे असले तरी शहीद खान यांनी सामान्य शिवसैनिकांना सोबत घेऊन विजय जामकर यांचा पराभव केला आहे. केवळ तीन मतांनी आमदार शहीद खान हे विजयी झाले असले तरी मात्र त्यांची चर्चा सर्वत्र झाली असल्याचे दिसून आले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा