Headlines

Pakistan Inflation How Much Do Sugar Rice And Oil Cost Viral Video Sparks Debate | साखर १५० तांदूळ ३५० अन् पीठ…, पाकिस्तानात किराणा मालाचे दर पाहून तुम्हाला धक्काच बसेल, पाहा व्हायरल व्हिडीओ


Pakistan Food Prices: भारतात साखरेचे दर वाढत असताना पाकिस्तानातील किराणा मालाच्या किमतींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुकानदाराने साखर १५० रुपये, पीठ १२५ रुपये, तेल ४५० ते ५५० रुपये, तर तांदूळ १२० ते ३५० रुपये किलो असल्याचे सांगितले. या व्हिडीओवर भारतीय नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Pakistan food prices
(फोटो सौजन्य – harichandparmarofficial/Instagram)
गेल्या काही आठवड्यांत साखरेचे दर झपाट्याने वाढले आहेत. महिनाभरात साखरेच्या दरात १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, काही शहरांमध्ये हा दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सामान्य वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण भारतात किराणा मालाचे दर वाढले असताना, पाकिस्तानमध्ये सध्या या वस्तू किती रुपयांना मिळतात? ही उत्सुकता देखील काही लोकांमध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर पाकिस्तानातील एका कंटेंट क्रिएटरने व्हिडीओच्या माध्यमातून दिलं आहे. साखर, तांदूळ आणि तेल यांसारख्या जेवणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टींचे भाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चला, पाहूया हा व्हायरल होणारा व्हिडीओ.

किती रुपयांना मिळतात वस्तू?

किती रुपयांना मिळतात वस्तू?

हा व्हिडीओ harichandparmarofficial या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ हरिचंद परमार नावाच्या एका पाकिस्तानी व्लॉगरने तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका किराणा मालाच्या दुकानात वस्तूंचे भाव विचारतोय. दुकानदाराने पिठाचा दर १२५ रुपये किलो, मोहरीच्या तेलाचा दर ४५० रुपये, कॅनोला ऑइलचा दर ५५० रुपये, तर साखरेचा दर १५० रुपये किलो असल्याचे सांगितले. तसंच, स्वस्त तांदूळ १२० रुपये, तर महाग तांदूळ ३५० रुपये किलो असल्याचेही दुकानदाराने सांगितले.
(फोटो सौजन्य – harichandparmarofficial/Instagram)

भारतात इतकी महागाई नाही?

​ ​

हा व्हिडीओ ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय, भारतामध्ये पाकिस्तानपेक्षा जास्त स्वस्ताई आहे. तर कोणी म्हणतंय, “इंडिया सर्वात बेस्ट, सार्‍या जगात हिंदुस्थान आमचा सर्वांत चांगला आहे.” असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा