महाराष्ट्र होणार रेल्वे फाटकमुक्त, तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा| Maharashtra Times
Railway Crossings: राज्यात रेल्वे फाटक ओलांडताना अनेक अपघात होतात. अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध नसतात. येत्या तीन वर्षांमध्ये हेच बदलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. राज्यात रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामाला प्राधान्य दिलं जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात…
