पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंब संस्थेच्या हितासाठी विवाहाबाबत गंभीर राहा
विवाह संस्थेवर हळूहळू हल्ले वाढत आहेत. भविष्यात कुटुंबाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. काही सरकारे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला कायद्याच्या कक्षेत आणून तिला पाठिंबा देत आहेत. एका छताखाली विवाहाशिवाय स्त्री-पुरुषांनी पती-पत्नीसारखे राहणे, हा कायदेशीर विषय असू शकतो, पण यामुळे विवाह संस्थेची नैतिकता नक्कीच दुखावली जाईल. एक आकडेवारी धक्कादायक आहे की, ॲरेंज मॅरेज 25 % ने घटली आहेत…
