Mira Bhayandar Rain Update: गेल्या काही वर्षांपासून पावसाळा आणि मिरा-भाईंदरमधील खड्डेमय रस्ते हे जणू समीकरणच बनले आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप होत असला, तरी शहराची भौगोलिक परिस्थितीही त्याला कारणीभूत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहरातील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण शेकडो कोटी रुपये खर्चुन करण्यात आले आहे. मात्र, निधीअभावी अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण अद्याप झालेले नाही. डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याची समस्या दरवर्षीची असल्याने पावसापूर्वी आवश्यक दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याची टीका होत आहे.
Shivsena News: ‘थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे’; शिंदेंच्या शिवसेनेचा उपनगराध्यक्ष सर्वांसमोर हे काय बोलून गेला? चहूबाजूने टीकेची झोड!
परिणामी, पावसाळा सुरू होऊन अवघा आठवडा उलटताच शहरातील अंतर्गत तसेच प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचत असल्याने खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून खड्डे चुकवताना अपघात होण्याची भीती सतावत असल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची अशी अवस्था झाली असेल, तर पुढील काही महिन्यांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीतीही काही वाहनचालकांनी व्यक्त केली. पालिका प्रशासनाच्या दरवर्षीच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Eknath Shinde : दगदग-धावपळीने अशक्तपणा, एकनाथ शिंदे रुग्णालयात, कशी आहे प्रकृती? Health Update समोर
पाणी रस्त्यावर
मिरा-भाईंदर महापालिकेने रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाबरोबरच नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरणाची कामे केली आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी नाल्यांमध्ये न जाता थेट रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली जात असून वाहनचालकांना पाण्यातूनच वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे नाल्यांच्या कामावर झालेल्या खर्चाच्या परिणामकारकतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

