Maharashtra Rain Update: ठाण्यात सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी तीन हात नाका उड्डाणपुलावर किरकोळ अपघातामुळे मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी साठलेले पाणी, खड्डे आणि पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असतानाच कोंडीत यामुळे भर पडली.

गेल्या तीन दिवसांमध्ये कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा येथे १ जुलै रोजी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये ६९.६, २ जुलै रोजी २४ तासांमध्ये १५८.२ आणि ३ जुलै २४ तासांमध्ये रोजी १११.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तीन दिवसांमध्ये कुलाबा येथे ३३९.६ मिलीमीटर पाऊस पडला. तर सांताक्रूझ येथे १ जुलैला सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये ९६.३ मिलीमीटर, २ जुलैला २०४.६ तर ३ जुलैला १०१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे एकूण ४०१.९ मिलीमीटर पाऊस तीन दिवसांमध्ये नोंदला गेला. कुलाबा आणि सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी ८.३० ते शनिवारी सकाळी ८.३० या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. दिवसभरात कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर अधूनमधून पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे ३७ मिलीमीटर तर कुलाबा येथे ५१ मिलीमीटर पावसाची नोंद सायं. ५.३० पर्यंत झाली.
Ritu Tawde | आजी-माजी महापौरांमध्ये जुंपली, पेडणेकरांकडून महापौर दालनाची रेकी, तावडेंचे गंभीर आरोप
दोन जिल्ह्यांत अतिरिक्त पाऊसमान
जून आणि जुलैची आत्तापर्यंतची मुंबईची सरासरी २४जून, २९ आणि ३० जून आणि गेल्या तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १ जून ते ३ जुलै या कालावधीत आत्तापर्यंत मुंबई शहरात ७८०.७ मिलीमीटर आणि उपनगरात ८१९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस असलेली पावसाची तूट आता दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊसमानापर्यंत पोहोचली आहे.
मुसळधार पावसाचे कारण काय?
महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती या आठवड्यातही कायम राहील, अशी शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात वायव्येकडील कमी दाबाचे क्षेत्र शनिवार, रविवारी दोन दिवसांत अधिक तीव्र होईल. हवेच्या खालच्या थरात वारेही विरुद्ध दिशेने वाहत आहेत. या प्रभावाखाली कोकण विभाग आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे.
Mumbai Fire: इमारतीत अग्नितांडव, रहिवासी अडकले; जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरुन उड्या, मुंबईत थरार
अंबा, कुंडलिका इशारा पातळीवर
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदी धोक्याच्या तर कुंडलिका नदी इशारा पातळीच्या पुढे गेली आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. अलिबाग शहरात सखल भागामध्ये पाणी साचल्याने रस्त्यांचा अंदाज येणे कठीण झाले आहे. शहरातील पीएनपीनगर, तळकरनगर तसेच रेवस बायपास रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
घाट रस्त्यांची केंद्राच्या पथकाकडून पाहणी
चिपळूण : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या कोकणातील घाट रस्त्यांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या टीएचडीसी या प्राधिकरणाचे पथक शुक्रवारी रत्नागिरी येथे दुपारी दाखल झाल आहे. नीरज अग्रवाल यांच्या पथकाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावरील सगळ्या घाट रस्त्यांची पाहणी करण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट, रायगड जिल्ह्यातील महाड-पुणे जोडणारा वरंधा घाट या घाटांची पाहणी शुक्रवारी या पथकाने केली आहे.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडून आतापर्यंतचे सर्वांत कडक आदेश जारी; दूध भेसळ रोखण्यासाठी २५ नियम, सुट्ट्या दुधाबाबत काय सांगितलं?
आंबेनळी घाट बंद
अलिबाग : अतिवृष्टी व पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट ३ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जारी केले आहेत. घाटमाथ्यावर सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

