Headlines

MADC to take charge of four new airports yavatmal baramati latur and dharashiv; राज्यातील ‘या’ चार नव्या विमानतळांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, हवाई वाहतूक अधिक…


यवतमाळ : महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने बारामती, लातूर, उस्मानाबाद (धाराशिव) व यवतमाळ येथील विमानतळांचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून या निर्णयाने एमएडीसीकडे चार नव्या विमानतळांची धुरा सोपविण्यात आली आहे.

धाराशिव विमानतळाचे 20 ऑगस्ट 2025 रोजी, लातूर विमानतळाचे 21 ऑगस्ट 2015 रोजी तर यवतमाळ विमानतळाचे 18 सप्टेंबर 2015 रोजी औपचारिक हस्तांतरण करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुषंगाने हा शासन निर्णय काढण्यात आला. शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून संबंधित विमानतळांचा विकास व आवश्यक त्या विस्ताराची कामे करण्यात येणार असून, प्रवासी विमानसेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच धावपट्ट्या विमानसेवेसाठी उपयुक्त व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारीही कंपनीवर राहणार आहे.
Maharashtra TimesLocal Train : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आता 18 डब्ब्यांची लोकल धावणार? विरार ते डहाणू रोडवर….
महत्त्वाचे म्हणजे, विमानतळांचे व्यवस्थापन व विकास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले असले तरी या विमानतळांचा मूळ मालकी हक्क राज्य शासनाकडेच कायम राहणार आहे.

भविष्यात राज्य शासनाकडून लागू करण्यात येणाऱ्या अटी, शर्ती किंवा धोरणात्मक बदल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस बंधनकारक असतील, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठवाडा व विदर्भातील हवाई दळणवळणाला चालना मिळणार आहे. प्रादेशिक विकास, उद्योग, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Maharashtra TimesPune News : आता बस अचानक बंद पडल्यास… एसटी बसबाबत परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

सेवांचे अद्ययावतीकरण आवश्यक

यवतमाळ विमानतळ शहरापासून सुमारे 5 ते 6 किमी अंतरावर आहे. हे विमानतळावरून सध्या व्यावसायिक उड्डाणे सुरू झालेली नाहीत. याचा वापर प्रामुख्याने प्रशिक्षण, चार्टर विमाने, शासकीय हेलिकॉप्टर व आपत्कालीन सेवांसाठी केला जातो. येथील सध्याची धावपट्टी ही लहान विमानांसाठी योग्य आहे. भविष्यात या विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार, मजबुतीकरण आणि नाइट लँडिंगची सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव अपेक्षित आहे. धावपट्टीचे अद्ययावतीकरण होणे, एटीआर-72 प्रकारची विमाने उतरू शकतील, अशी सुविधा उपलब्ध होणे, नवीन टर्मिनल इमारत, एअर ट्राफिक कंट्रोल, सुरक्षाव्यवस्था अशा विकासकामांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

विमानतळ विकसित झाल्यास केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत यवतमाळला हवाई नकाशावर आणण्याचा प्रस्ताव आहे. भविष्यात यवतमाळहून नागपूर, मुंबई, पुणे, हैदराबाद अशा शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत