Mumbai Viral Video: महाराष्ट्रातील मराठी-हिंदी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर ऑटो रिक्षा ट्रेनच्या सामान कक्षात ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मराठी न आल्यामुळे रिक्षाचालक मुंबई सोडून गावाकडे परतत असल्याचा दावा केला जात आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय घडतंय?
हा व्हिडीओ pawanraja808080 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतून आलेले अनेक ऑटोचालक आहेत. पण ही मंडळी ग्राहकांसोबत मराठी भाषेत संभाषण करायला नकार देतात, अशी तक्रार वारंवार केली जाते. बरं, या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत एक मोठं आंदोलनदेखील झालं होतं. याच पार्श्वभूमीवर RTOकडून ही भाषेसंदर्भात तपासणी करण्यात आली. आणि यामध्ये नापास झालेला रिक्षावाला आपल्या गावी परतत असल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो रेल्वेच्या सामान कक्षात रिक्षा ठेवताना दिसतोय. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकरी काय म्हणताहेत?
हा व्हायरल व्हिडीओ खरोखरच मराठी येत नसल्यामुळे मुंबई सोडून जात असलेल्या रिक्षावाल्याचा आहे का? याबाबत कुठेही या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
असो, मुंबईतील बांद्रा, गोरेगाव, कुर्ला, दादर, बोरीवली, वडाळा आणि अंधेरी यांसारख्या प्रमुख वाहतूक केंद्रांवर ही तपासणी करण्यात आली. मात्र, नोटीस मिळाल्याने चालकांचे बॅज तात्काळ रद्द किंवा निलंबित केले जाणार नाहीत. चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान मिळवण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच, पुढील कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.

