Keshav Upadhye on Sonia Gandhi : “व्हिडिओमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे हावभाव कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसतात. स्वातंत्र्यदिनी ‘वंदे मातरम्’ सुरू असताना नेमके हे हावभाव कशासाठी होते?” असा सवाल केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई/नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावरुन शनिवारी वाद निर्माण झाला; ‘ वंदे मातरम् ‘ गीत पूर्ण वाजवण्यास ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतल्याचा आरोप भाजपने केला. मात्र, काँग्रेसने स्पष्ट केले की, सोनिया गांधी केवळ पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी खुर्चीची मागणी करत होत्या. यावरुन भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी ‘गांधी घराण्याला ‘वंदे मातरम्’ची ॲलर्जी का?’ असा सवाल विचारला आहे.
केशव उपाध्ये काय म्हणाले?
“गांधी घराण्याला ‘वंदे मातरम्’ची ॲलर्जी का? भारताच्या सांस्कृतिक चेतनेचे, सभ्यतागत वारशाचे आणि राष्ट्रभावनेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनावेळी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या हावभावांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.”
“व्हिडिओमध्ये सोनिया गांधी आणि त्यानंतर राहुल गांधी यांचे हावभाव कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसतात. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी ‘वंदे मातरम्’ सुरू असताना नेमके हे हावभाव कशासाठी होते?” असा सवाल केशव उपाध्ये यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर विचारला आहे.
“‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नाही; ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी, मातृभूमीच्या वंदनेशी आणि कोट्यवधी भारतीयांच्या राष्ट्रभावनेशी जोडलेले आहे. मग प्रश्न काँग्रेसला आणि विशेषतः गांधी घराण्याला… ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाबाबत एवढी अस्वस्थता का?”
“देश बदलला, भारताचा आत्मविश्वास वाढला आणि राष्ट्रभावना अधिक प्रखर झाली. पण काँग्रेसच्या नेतृत्वाची राष्ट्रभावनेच्या प्रतीकांकडे पाहण्याची भूमिका आजही संशय निर्माण करणारी का ठरते?” असंही उपाध्ये म्हणतात.
पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘वंदे मातरम’चे पूर्ण रूप गायले गेले होते, असे स्पष्ट करत काँग्रेसने सांगितले की, सोनिया गांधी या केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी खुर्ची मागत होत्या, कारण ते बराच वेळापासून उभे होते.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा