Income Tax Return Filing: एक कोटींची कमाई 3-3 घरांचा मालक असलेल्या एका आयआयटीयनला आयकर भरण्यासाठी 15000 रुपये उसने घ्यावे लागल्याची धक्कादायक व्हायरल कहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

एखाद्या व्यक्तीला लाखो रुपयांचा पगार, वर्षाला कोट्यवधींचे पॅकेज आणि अनेक घरांचा मालक असलेल्या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसेल, असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं. पण, सोशल मीडियावर एक असं प्रकरण समोर आलं आहे जे तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. सध्या देशात इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचा हंगाम सुरू असून 31 जुलैपर्यंत करदात्यांना आयकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.
Tenant Rights: भाडेकरू आहात? घरमालक Rent Receipt देत नसेल तर घाबरू नका! जाणून घ्या तुमचे हक्क, वादावर लागेल ब्रेक
कागदावर करोडपती दिसणाऱ्या एका व्यक्तीला केवळ 15000 रुपये टॅक्स भरण्यासाठी मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागले. या रंजक प्रकरणामागील संपूर्ण सत्य जाणून घेऊया.
एक आयआयटीयन क्लायंट अन् CA ची व्हायरल पोस्ट
चार्टर्ड अकाउंटंट प्रतिभा गोयल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका क्लायंटबद्दल (ओळख उघड न करता) पोस्ट सामायिक केली, जी सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाली. अलीकडेच गोयल यांनी एका तरुण आयआयटी पदवीधराचा ITR दाखल केला, जो गेल्या पाच वर्षांपासून वार्षिक 1 कोटींपेक्षा जास्त कमावतो. बक्कळ उत्पन्न, मालकीची तीन घरे आहेत, त्यापैकी दोन घरांचे बांधकाम सुरू आहे. अशाप्रकारे, साहजिकच प्रभावी उत्पन्न आणि संपत्ती पाहता या व्यक्तीकडे अमाप पैसा असणार असंच कोणालाही वाटेल. पण खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला, जेव्हा आयटीआर दाखल करण्याची वेळ आली.
15,000 रुपये उसने घ्यावे लागले
सीए प्रतिभाने क्लायंटला कर म्हणून उर्वरित 15000 रुपये भरण्यास सांगितले, तेव्हा त्याने आपल्याकडे सध्या रोख रक्कम नाही आणि ऑगस्टपर्यंत आयटीआर दाखल करणे पुढे ढकलावे जेणेकरून पुढचा पगार आल्यावर पैसे भरू शकेल असे सांगितले. मात्र, सीएने समजावून सांगितले की मुदतीनंतर मोठे व्याज आणि दंड भरावा लागेल, तेव्हा त्या आयआयटीयनला दंड टाळण्यासाठी 15000 रुपये ऊसने घेण्यास भाग पडले.
भरघोस कमाई करूनही तुमच्याकडे लगेच खर्च करण्यासाठी पैसे नसतील तर कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे या घटनेतून स्पष्टपणे दिसून येते. यामधून स्पष्ट होते की, केवळ जास्त पैसे कमावणे पुरेसे नाही. प्रत्येकाने कर भरण्यासाठी पैसे बाजूला ठेवणे, आपत्कालीन निधी उभारणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि योग्य आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

