Heavy rainfall alert issued for mumbai and four districts orange alert in pune; पावसाचे पुन्हा कमबॅक! मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार; हवामान खात्याचा इशारा
Heavy rainfall alert issued for mumbai and four districts orange alert in pune; पावसाचे पुन्हा कमबॅक! मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार; हवामान खात्याचा इशारा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई परिसरात गुरुवारपासून पावसाचा जोर थोडा वाढू शकेल, असा अंदाज असताना मुंबईमध्ये सोमवारी रात्रीपासूनच पाऊस वाढायला सुरुवात झाली. महामुंबई परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची उपस्थिती होती. त्यामुळे काही रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. याचा परिणाम मुंबईच्या रस्ते व रेल्वे वाहतुकीवर झाला.
मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी स. ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये १४ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे २०.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे सांताक्रूझ येथे २००० मिमी पावसाचा टप्पा ओलांडला, तर कुलाबा येथे १६७५.८ मिमी पावसाची आत्तापर्यंत नोंद झाली आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभरात फारशी उसंत घेतली नाही. सांताक्रूझ येथे स. ८.३० ते सायं. ५.३०पर्यंत ४३.८ मिमी, तर कुलाबा येथे २४.४ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे तापमानात घट झाली. सांताक्रूझ येथे २७.१ तर, कुलाबा येथे २७.६ अंश से. कमाल तापमान होते.
सध्या मध्य आणि लगतच्या उत्तर द्वीपकल्पीय भारतावरून, समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किमी उंचीवर शिअर झोन (विरुद्ध दिशेने वाहणारे वारे) कायम आहे, हा पट्टा उंचीनुसार दक्षिणेकडे झुकलेला आहे. मान्सून ट्रफ आता बिकानेर, वायव्य मध्य प्रदेश व लगतच्या भागातील कमी दाबाचे क्षेत्र, सीधी, रांची आणि दिघा यांतून जात आग्नेयेकडे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारले आहे. वायव्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागातील कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी सकाळी ०८.३० वाजता त्याच भागात कायम होते. संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किमी उंचीपर्यंत विस्तारलेली असून, ती उंचीनुसार दक्षिणेकडे झुकलेली आहे. यांच्या संयुक्त परिणामामुळे महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. महामुंबईच्या काही भागांसह पुणे, सातारा घाट परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार होती.
आजही जोरदार हजेरी
मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे घाट परिसराला बुधवारी ‘ऑरेंज ॲलर्ट’ आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा