Headlines

Heavy Rain Update Some Part Sheet metal roof Of Gaymukh Metro Station fall in Thane


ठाण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर गायमुख मेट्रो स्थानकावर पत्रे निखाळल्याची घटना घडली आहे.

Thane News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ‘गायमुख – कासारवडवली – वडाळा’ या ‘मेट्रो-४’ आणि ‘मेट्रो-४ अ’ या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पातील महत्वपूर्ण स्थानक असणाऱ्या गायमुख मेट्रो स्थानकाचे पत्रे सोमवारी निखळले. सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका या स्थानकाच्या पत्र्यांना बसला. अद्याप या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झालेली नसताना अशी दुर्घटना घडल्याने या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या ‘गायमुख-कासारवडवली-वडाळा’ या ‘मेट्रो-४’ आणि ‘मेट्रो-४ अ’च्या गाड्यांच्या चाचणीसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गायमुख स्थानकात दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत या मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली आणि विजय गार्डन स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या मार्गावरील मेट्रो कामाच्या कासवगतीचा मुद्दा समोर आला.

वर्ष उलटूनही या मार्गावरील मेट्रोसेवा सुरू झालेली नसताना सोमवारी या स्थानकावरील पत्रे निखळल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. सुदैवाने या प्रकारात कोणालाही इजा झाली नाही. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सर्वच स्थानकांमधील पत्रे आणि इतर साहित्यबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक सुरज सिंग यांनी केली.

ठाण्यात वृक्षपडझडीची ‘शंभरी’

धुवाँधार पाऊस, सोसाट्याचा वारा, काँक्रीटचा फास आणि अशास्त्रीय छाटणीमुळे ठाण्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११० वृक्ष उन्मळून पडले. यासोबतच ३८ फांद्याही कोसळल्या. या पडझडीदरम्यान १४ झाडे व ६ फांद्या धोकादायक अवस्थेत असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाल्या. यावेळी रस्त्यावर उभ्या पांडुरंग भुवड या पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच कोसळलेल्या वृक्षांची छाटणी करताना रेस्क्यू टीमचे फायरमॅन अंकित यादव यांना गंभीर दुखापत झाली.

जखमींवर रुग्णालयात उपचार

लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरून चालत जाणाऱ्या पांडुरंग भुवड यांच्यावर झाड कोसळले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि मीनल संख्ये घटनास्थळी दाखल झाले. रेपाळे यांनी भुवड यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, श्रीरंग सोसायटी येथील वृंदावन बस थांब्याशेजारी धोकादायक स्थितीतील झाड कापताना रेस्क्यू फायरमॅन अंकित यादव (३२) यांच्या पायाला कटर मशिन लागून दुखापत झाली. त्यांना ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा