Baba Ramdev On Kangana Ranaut : बाबा रामदेव यांनी कंगना रणौतच्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – योगगुरू बाबा रामदेव यांनी कंगना रणौतच्या जेन झीबद्दल केलेल्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्यावर टीका केली आहे. देशातील तरुणांना ‘जनरेशन गटर’ म्हणणं हे वाईट मानसिकता आहे, असं बाबा रामदेव म्हणाले.
कंगनाच्या जेन झीबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बाबा रामदेव म्हणाले, ‘तिची शैक्षणिक पात्रता काय आहे? तिचं बालपण कसं होतं? तिनं तरुण असताना काय केलं? तिचे जुने कारनामे काय होते?’ मला अशा लोकांबद्दल बोलायचं नाही. जेन झीसह कोणत्याही देशातील कोणत्याही तरुणांना गटार म्हणणं ही मानसिक संतुलन बिघडल्याची लक्षणं आहेत. हे चुकीचं आहे. जे काही घडत आहे, त्याबद्दल तिच्या पक्षाच्या सदस्यांनी दखल घेतली पाहिजे.’
कंगना तुमची अनुयायी असून स्वतःला सनातनी मानते, असं विचारलं असता बाबा रामदेव म्हणाले, ‘जर ती माझ्या योगाचं कौतुक करत असेल, तर मी तिची पापं झाकून ठेवू का?’ तरुणांना कोणतीही जात नसते. तरुणांमध्ये सर्वांचा समावेश असतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दलित, आदिवासी, वनवासी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अशी सर्व मुलं आहेत. आजची तरुण पिढी स्वतःच एक शक्ती आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही, असंही बाबा रामदेव यांनी सांगितलं. टीव्ही९ भारतवर्षसोबत साधलेल्या संवादात रामदेव बाबा बोलत होते.
Kangana Ranaut VS Genz | गटरछाप…आंदोलनाचे व्हिडीओ बघून मळमळतंय, खासदार कंगना रनौत काय बोलल्या?
काय म्हणालेली कंगना?
कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेलं की, ‘मी या पिढीला ‘जनरेशन गटार’ म्हणते. या तरुणांकडे समाजाला किंवा व्यवस्थेला देण्यासाठी काहीही नाही. हे तरुण अभ्यासात चांगले नाहीत आणि घर सांभाळण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. आई-वडिलांच्या पैशांवर जगणं, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि स्वतःच्या पायावर उभं न राहता स्वातंत्र्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. ही पिढी गटार आहे.’
Shubhavi Gupte : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती! अवघ्या 20व्या वर्षी स्वबळावर घेतली कार, व्यक्त केल्या भावना कंगनाच्या वक्तव्यानंतर बराच वाद निर्माण झालेला. त्यावर स्पष्टीकरण देताना कंगना म्हणालेली की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना विद्यार्थी ‘एक्जाम बडी’ म्हणतात. कोणी त्यांना देव मानतं, कोणी लीडर मानतं, घरातील सदस्य मानतात. त्यांचा तुम्ही अपमान करू शकत नाही. हे कूल बनण्याचं लक्षण नाही. हा एक साधा नियम आहे. हे तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला शिकावं लागेल. तुम्ही या स्त्रीवाद्यांकडून प्रभावित होऊ नका. स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. बाहेर जाऊन तुम्हाला मर्यादेतच राहावं लागेल.’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा