asian legends league india beat pakistan by 2 wickets rishi dhawan fifty ; पाकिस्तानच्या हातातला सामना भारताने अखेरच्या षटकात हिसकावला! कोण ठरला विजयाचा शिल्पकार? लीगमधील सलग दुसरा विजय
asian legends league india beat pakistan by 2 wickets rishi dhawan fifty ; पाकिस्तानच्या हातातला सामना भारताने अखेरच्या षटकात हिसकावला! कोण ठरला विजयाचा शिल्पकार? लीगमधील सलग दुसरा विजय
IND vs PAK, Asian Legends League 2026 : इंडियन रॉयल्सने पाकिस्तान पॅंथर्सचा २ विकेट्सने पराभव करत स्पर्धेमध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. यावेळी ऋषी धवनच्या ५० धावा आणि सरुल कंवरच्या ४६ धावांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : एशियन लेजेंड्स लीग २०२६ मधील ६ व्या सामन्यात इंडियन रॉयल्स संघाने पाकिस्तान पॅंथर्सचा २ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात इंडियन रॉयल्सकडून ऋषी धवन आणि सरुल कंवर यांनी फलंदाजीत उत्तम कामगिरी केली. तर गोलंदाजीत शादाब जकाती आणि सुबोध भाटी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. ऋषी धवनने फलंदाजीत ५० धावांची खेळी केली आणि गोलंदाजीत १ बळीही घेतला. या स्पर्धेत इंडियन रॉयल्सचा हा सलग दुसरा विजय आहे. याआधी बांगलादेश टायगर्सचा पराभव केला होता.
इम्रान नझिरच्या ४७ धावा
सामन्यात इंडियन रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान पॅंथर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मोहम्मद यासिर ६ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार इम्रान नझिरने २९ चेंडूंत ४७ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तर इबरार अट्टा आणि तौफिक उमर यांनी प्रत्येकी ३९ धावा केल्या. यासिर शाहने १० धावांचे योगदान दिले. पाकिस्तान पॅंथर्सचा संघ २० षटकांत ६ बाद १६७ धावांपर्यंत पोहोचू शकला.
१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडियन रॉयल्स संघाने १७.४ षटकांत ८ बाद १७१ धावा करत विजय मिळवला. कर्णधार नमन ओझा या सामन्यातही अपयशी ठरला आणि तो ४ धावांवर बाद झाला. अभिषेक जलोटाने १९ चेंडूंत ३० धावा केल्या.
ऑलराउंडर ऋषी धवनने ३३ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५० धावा फटकावल्या. तर सरुल कंवरने २९ चेंडूंत ४६ धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. शेवटच्या टप्प्यात अनुरीत सिंगने ६ चेंडूंत नाबाद १६ धावा करून संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद इरफान, राहत अली आणि यासिर शाह यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा