Headlines

Amaal Mallik : ‘एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो’, केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी अमाल मलिकची संतप्त पोस्ट


Amaal Mallik : सुप्रसिद्ध गायक अमाल मलिकनं केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

Amaal Mallik On Ketan Agarwal Death Case
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्येनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार अमाल मलिकनं या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.

अमाल मलिकची पोस्ट

अमाल मलिकनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘केतनला जीवे मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती, फक्त एकदा नाही म्हणाली असती तरी पुरे झालं असतं. दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीवर प्रेम आहे, हे सांगितलं पाहिजं होतं. हे सांगून पण त्यानं ऐकलं नाही आणि तो मागेच लागला असता तर त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल सांगायचं होतं. कुटुंबाला यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजं होतं. या जगात कुठेही एका स्वतंत्र, सुशिक्षित आणि कमावणाऱ्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध आणि तिच्या इच्छेविरुद्ध जाण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही.’

Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा

‘भारतातील कायदे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी चांगले आहेत, पण व्यवस्थेचा गैरवापर आणि हेराफेरी का करायची? फक्त एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो. कोणाचं तरी मूल हिरावल्यानंतर आपण सुखी आयुष्य जगू शकतो, असा विचार करण्याची या दोघांची हिंमतच कशी झाली? एक जीव गेला, कुटुंब उद्ध्वस्त झाली. राक्षस.’ असं अमालनं म्हटलंय.

आणखी एक पोस्ट शेअर करत अमालनं लिहिलं की, ‘वर्षानुवर्षे महिलांवर पुरुषांमुळे खूप अत्याचार झाले आहेत आणि त्यांनी खूप सहन केलंय. त्यासाठी मी सर्व महिलांची माफी मागतो. पुरुषप्रधान विचारधारेला विरोध करणाऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. अत्याचाराविरोधात लढा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पण हा लढा फक्त नीच लोकांसाठी मर्यादित ठेवा. जे लोक स्त्रियांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात आणि त्यांना एखाद्या जनावराप्रमाणे वागवतात, अशा लोकांविरोधात आवाज उठवला पाहिजे. स्त्रियांनी काय कपडे घालावेत हे सांगणारे लोकही तितकेच घातक असतात. पण, प्रत्येक गोष्टीला ‘टॉक्सिक’ असं नाव दिल्यामुळेच आपण खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होतं. नात्यामध्ये कोणत्याही बाजूनं होणारी शारीरिक हिंसा ही टॉक्सिक असते. भावनांपेक्षा पैशांना अधिक महत्त्व देणंही टॉक्सिक आहे. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी लग्न करणं टॉक्सिक आहे. तसंच ज्याच्यासह आयुष्यभर राहण्याचा कोणताही हेतू नाही, अशा व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणे हे देखील तितकंच टॉक्सिक आहे.’

Maharashtra TimesGirija Oak : ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांचंही कुटुंब आहे’, वडील गिरीश ओक यांच्याबद्दल गिरिजा ओकचं वक्तव्य
‘तुम्हाला वाटते का पुरुषांना शांततेशिवाय दुसरं काही हवं असतं? शारीरिक संबंध तर सगळीकडे उपलब्ध आहेत. पण, तुमच्या गरजा आणि इच्छांची मोठी यादी असते, विशेषतः जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा खूप अपेक्षा ठेवल्या जातात. इन्स्टाग्रामवर दिखावा करण्यासाठी लग्न पाहिजे असतं की, खरं प्रेम असलेलं लग्न पाहिजे? तुम्ही लोणावळ्यातील एका सुंदर हनिमूनमध्येही आनंदी राहू शकता, पण तुम्हाला खरं प्रेम असेल तर तो परदेशामध्ये घेऊन जाईल असं वाटतं. आपल्या सर्वांना उत्तम आयुष्य पाहिजे असतं हे समजू शकतो, पण फक्त मालदीवमध्ये खऱ्या प्रेमाची भावना वेगळी असते का? या माणसाबरोबर जे झालं आहे, ते नव्हतं व्हायला पाहिजे. त्याचं हसणं आणि त्याचे डोळे बघा… तिच्याशी लग्न करण्यासाठी तो किती आनंदी होता ते बघा. केतन अग्रवाल खूप निर्मळ मनाचा आणि गोड वाटत होता.’ असं अमालनं शेवटी म्हटलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा