Headlines

Actor Suresh : सिनेमामुळे अपयश पदरी, पत्नीकडूनही विश्वासघात, दिग्दर्शकासोबत पळाली; सुप्रसिद्ध अभिनेत्याची हृदयद्रावक कहाणी


Bollywood Actor Suresh : ५० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश यांच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया.

Actor Suresh Unknown Facts
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत एक असा अभिनेता होता, ज्या अभिनेत्याला आज भारतीय चित्रपटसृष्टी पूर्णपणे विसरून गेली आहे. त्यानं बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली असून हा अभिनेता ५०च्या दशकात यशाच्या शिखरावर होता. त्यानं एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आणि सुरैयापासून ते मुमताज महल आणि वैजयंतीमालापर्यंत, त्यांच्या काळातील अनेक महान अभिनेत्रींसोबत रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, एका विश्वासघातानं त्याला इतका धक्का बसला की, वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी त्याचं निधन झालं.

१९३० मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली

हा अभिनेता म्हणजे ५० च्या दशकातील प्रसिद्ध स्टार सुरेश असून त्यांचं खरं नाव नाझिम अहमद होतं. त्यांचा जन्म १९२८ मध्ये पंजाबमधील गुरदासपूर येथे झाला. सुरेश यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये काम केलं असलं तरी ए. आर. करदार दिग्दर्शित ‘ठोकर’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. सुरेश यांनी बालकलाकार म्हणून बॉम्बे टॉकीजसाठी ‘बंधन’, ‘अंजन’, ‘नया संसार’ आणि ‘बसंत’ या चार चित्रपटांमध्ये काम केलं.
Maharashtra TimesShantanu Moghe : प्रिया मराठेचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न, पहिल्यांदाच बोलला शंतनू मोघे; म्हणाला, ‘मी नक्की पूर्ण करणार’
चित्रपट इतिहासकार शिशिर कृष्ण शर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, सुरेश यांनी सर्वप्रथम १९४६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सोना चांदी’ या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी सुरैयासोबत ‘रंग महल’मध्ये काम केलं, पण दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी ए. आर. करदार दिग्दर्शित आणि गीता बाली अभिनीत ‘दुलारी’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
Maharashtra TimesSunanda Sharma : ब्रेकअपमुळे मिळाला धडा, अध्यात्म्याकडे वळली अन् बदललं आयुष्य; 9 मुलांना घेतलं दत्तक, लोकप्रिय गायिकेनं सांगितला प्रसंग
त्यानंतर त्यांनी ‘दास्तां’, ‘जादू’, ‘दीवाना’ आणि ‘यास्मिन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, १९५० मध्ये ते पाकिस्तानला गेले, जिथे त्यांनी ‘दो किनारे’ आणि ‘ईद’ हे चित्रपट बनवले, पण नंतर ते भारतात परतले. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मधुबाला, सुरैया, नलिनी जयवंत आणि पद्मिनी यांसारख्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केलं.

Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली

१९५७ मध्ये, सुरेश यांनी ‘कॅप्टन किशोर’ या चित्रपटात किशोर कुमार यांच्यासोबत काम केलं. मात्र, १९६० च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि त्यांनी सहाय्यक व चरित्र भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. सुरेश यांनी ‘आप की परछाईयां’, ‘मजबूर’, ‘ये रात फिर ना आयेगी’, ‘रेशम की डोरी’, ‘सेवक’ आणि ‘अदालत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. मात्र, नंतर त्यांनी निर्माता बनण्याचा निर्णय घेतला आणि शशी कपूर, रीना रॉय आणि अन्वर हुसेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गंगा और सूरज’ हा चित्रपट बनवला. चित्रपटाचा बराचसा भाग चित्रित झाल्यानंतर अभिनेते अन्वर हुसेन आजारी पडले. यामुळे तो चित्रपट बंद पडला आणि कादर खान यांना सिनेमात घ्यावं लागलं. त्या अभिनेत्यानं आपल्या चित्रपट कारकिर्दीतील सर्व कमाई त्या चित्रपटात गुंतवली आणि नंतर तो कंगाल झाला.
Maharashtra TimesAamir Khan : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला आता मुस्लीम समाजाचा विरोध, अभिनेत्याविरोधात फतवा जारी

पत्नीनं केला विश्वासघात

‘गंगा और सूरज’च्या सिनेमाच्या अपयशाने सुरेश आधीच खचले होते पण, त्याचबरोबर अभिनेता आपल्या पत्नीचा विश्वासघातही सहन करू शकला नाही. अभिनेत्री शम्मीने एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, तिचा पती सुलतान अहमदचं अभिनेता सुरेश यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. सुलतान अहमद ‘गंगा और सूरज’चं दिग्दर्शन करणार होता आणि या संदर्भात तो सुरेश यांना वारंवार भेटायचा, अनेकदा अभिनेत्याच्या घरी जायचा. यामुळे सुरेश यांची पत्नी सुलतान अहमदच्या अधिक जवळ आली आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी तिनं पतीचं घर सोडलं. आपला चित्रपट ‘गंगा और सूरज’ अपूर्ण राहिल्याने दुःखी असलेले सुरेश अहमद, पत्नीच्या विश्वासघातामुळे इतके खचले होते की, ते स्वतःला सावरू शकले नाहीत आणि १४ जुलै १९७९ रोजी, वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा