बारामतीच्या लेकीने नीटच्या परीक्षेत देशात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. बारामतीची विद्यार्थिनी श्रावणी कृष्णा कुदळे हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट (युजी) २०२६ मध्ये बारामतीच्या कन्येने ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण राज्याची मान उंचावली आहे. श्रावणी कृष्णा कुदळे हिने ७२० पैकी तब्बल ७१० गुण मिळवत ऑल इंडिया रँक (एआयआर) ५ क्रमांक पटकावला आहे. एवढेच नव्हे, तर देशातील सर्व मुलींमध्ये प्रथम क्रमांक, ओबीसी (एनसीएल) प्रवर्गात ऑल इंडिया रँक-१ आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवत तिने यशाचा नवा उच्चांक गाठला आहे.
श्रावणीला ९९.९९ टक्के
श्रावणीच्या या दैदिप्यमान यशामुळे बारामतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, तिचे आई-वडील दोघेही पुणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षक दाम्पत्याच्या घरातील मुलीने देशपातळीवर मिळवलेले हे यश शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. श्रावणीने ९९.९९ टक्के मिळवले आहेत. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते.
श्रावणीच्या जिद्दीला यश
श्रावणीच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे काटेकोर नियोजन, पालकांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे मोलाचे सहकार्य असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व लहानपणापासूनच तिच्या मनावर बिंबवले. त्याच संस्कारांच्या बळावर श्रावणीने वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवण्याच्या स्वप्नाला यशाचे पंख दिले. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी श्रावणीचे यश प्रेरणादायी ठरले आहे. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरही सर्वोच्च यश मिळवता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.
श्रावणीला बायोलॉजीमध्ये पैकीच्या पैकी
वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे श्रावणीचे ध्येय असल्याचे तिने सांगितले. तिच्या यशामुळे महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा पुन्हा एकदा देशासमोर ठळकपणे अधोरेखित झाली आहे. श्रीवणीने 720 पैकी 710 मार्क मिळवले आहेत. विशेष म्हणजे तिला बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360 मार्क मिळाले आहेत. तर केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 आणि फीजिक्स 180 पैकी 175 मार्क मिळाले आहेत. श्रावणीला मिळालेल्या या यशानंतर तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
श्रावणीवर शुभेच्छांचा वर्षाव
जिद्द आणि चिकाटी असेल, त्याचबरोबर सातत्याने काम करण्याची तयारी असेल तर आपण यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो. श्रावणीने दिवस-रात्र अभ्यास करत नीट परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे श्रावणीला मिळालेले हे यश देशातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रेरणादायी ठरले आहे. आगामी काळात श्रावणीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन यशस्वी तज्ज्ञ डॉक्टर व्हावे, अशा शुभेच्छा तिला दिल्या जात आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा