Headlines

भारताचे 6 फलंदाज मिळून करू शकले नाहीत ते एकट्या बुमराहने केलं; इंग्लंडविरुद्ध 154च्या स्ट्राईकने तुफान फटकेबाजी


Jasprit Bumrah News : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत जसप्रीत बुमराहने 13 चेंडूत 20 धावांची झंझावाती खेळी केली. भारताच्या सहा फलंदाजांच्या एकूण धावांपेक्षाही बुमराहच्या धावा जास्त ठरल्या.

Jasprit Bumrah News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : जसप्रीत बुमराह हा भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज आणि मोठ्या सामन्यांतील मॅचविनर म्हणून ओळखला जातो. मात्र, गरज पडल्यास तो बॅटनेही अतिशय महत्त्वपूर्ण असे योगदानही देऊ शकतो, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताची फलंदाजी कोलमडलेली असताना बुमराहने अवघ्या 13 चेंडूंत 20 धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे भारताच्या सहा फलंदाजांनी मिळून जितक्या धावा केल्या नाहीत, त्यापेक्षा अधिक धावा बुमराहने एकट्याने केल्या. त्यामुळे बुमराहची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

एका षटकातच साकिब महमूदची धुलाई

भारतीय डावातील 43व्या षटकात बुमराहने साकिब महमूदवर जोरदार हल्ला चढवला. या षटकात त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावत तब्बल 18 धावा वसूल केल्या. फ्लिक, पुल आणि मिडविकेटच्या दिशेने खेळलेल्या फटक्यांनी त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. अखेरीस त्याने 13 चेंडूंत 20 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यापूर्वी 2022 मध्ये एजबॅस्टन कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा ठोकत त्याने विश्वविक्रमही केला होता.

Maharashtra TimesIND vs ENG 2nd ODI : टीम इंडियाच्या सहा फलंदाजांची निराशाजनक कामगिरी, दुहेरी आकडाही गाठला नाही, 55 धावांत दिल्या 7 विकेट; इंग्लंडसमोर 234 धावांचे लक्ष्य

सहा फलंदाजांपेक्षा बुमराहचीच खेळी मोठी

विराट कोहली (65) आणि श्रेयस अय्यर (66) यांच्याशिवाय भारताचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. ईशान किशन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक, वॉशिंग्टन सुंदरने दोन, गुरनूर ब्रारने सात धावा केल्या, तर प्रसिद्ध कृष्णा आणि शिवम दुबे खातेही उघडू शकले नाहीत. या सहा फलंदाजांनी मिळून केवळ 11 धावा केल्या, तर बुमराहने एकट्याने 20 धावा फटकावल्या.

Maharashtra TimesRohit Sharma Virat Kohli : रोहित विराटने गांगुली-द्रविडला मागे टाकत इतिहास रचला; इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये अनोखा विक्रम

178-3 वरून भारताचा डाव कोसळला

भारत एकवेळ 178 धावांवर तीन विकेट अशा भक्कम स्थितीमध्ये होता. मात्र विराट कोहली बाद झाल्यानंतर डावाला अचानक गळती लागली. पुढील 55 धावांत भारताने सर्व सात विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ 233 धावांत सर्वबाद झाला. या पडझडीत बुमराहची आक्रमक खेळीच भारतासाठी अखेरच्या टप्प्यातील सर्वात सकारात्मक गोष्ट ठरली.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा