Missing Student Found Dead: दोन महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद शेवट झाला आहे. भारतीय विद्यार्थ्याचा निष्प्राण देह हेलसिंकीच्या समुद्रात सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हेलसिंकी: फिनलँडमध्ये रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झालेल्या हैदराबादचा १८ वर्षीय विद्यार्थी मनीदिप रेड्डी गुज्जाचं शव सापडलं आहे. हेलसिंकीच्या समुद्रात त्याचा निष्प्राण देह सापडला. तो ५ मे रोजी हेलसिंकीतील एका शॉपिंग मॉलमध्ये दिसला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. फिनलँडच्या भारतीय दूतावासानं ईमेलच्या माध्यमातून मनीदिपच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबाला दिली.
फिनलँडच्या अधिकाऱ्यांनी निष्प्राण देहाची ओळख पटवली. मनीदिप रेड्डी हैदराबादच्या हयातनगरचा रहिवासी होता. मनीदिप फिनलँडच्या ‘लॅपिनरांता-लाहती युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’चा विद्यार्थी होता. तो तिथे सॉफ्टवेअर अँड सिस्टिम्स इंजिनीअरिंगमध्ये पदवीचा अभ्यास करत होता. मनीदिपच्या कुटुंबियांनी या प्रकरणी संशय व्यक्त केला आहे. मनीदिपचा मृत्यू संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणी निष्पक्ष आणि सखोल तपास व्हावा, अशी मागणी कुटुंबाचे वकील के. एल. बी. कुमार यांनी केली. Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; 15 जणांचा करुण अंत, उंच उसळणाऱ्या लाटांमुळे घात? २९ मेनंतर फिनलँडच्या अधिकाऱ्यांसोबतचा संवाद पूर्णपणे बंद झाला होता. विद्यार्थी बेपत्ता झाल्यावर तिथल्या पोलिसांनी तपासात चालढकल केली. त्यांनी नीट तपास केला नाही, असा गंभीर आरोप कुमार यांनी केला. मृताच्या कुटुंबियांनी या प्रकरणी केंद्र सरकारची मदत मागितली आहे. मनीदिपच्या आई, वडिलांची फिनलँडला जाण्याची व्यवस्था सरकारनं तातडीनं करायला हवी, अशी मागणी कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
मनीदिपच्या मृत्यूमागे कोणताही गुन्हा नसल्याचं फिनलँडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बोटांच्या ठशांवरुन पोलिसांनी मनीदिपच्या मृतदेहाची पडताळणी केली. मनीदिपच्या कपड्यांमध्ये पोलिसांना एक पाकिट सापडलं. त्यात मनीदिपचं फिनिश ओळखपत्र होतं. यासोबतच मनीदिपच्या आईचं एक क्रेडिट कार्ड आणि भारतीय चलनातील ५०० रुपये होते. Spain Fire: कारमध्ये बसलेल्या पर्यटकांचा होरपळून शेवट; भीषण वणव्यात 12 जणांचा अंत, 23 जण बेपत्ता मनीदिपनं ४ मे रोजी आईला फोन केला होता. हाच त्याचा अखेरचा कॉल ठरला. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्या दिवशी मनीदिप मित्रांसोबत एका गॅदरिंगला गेला होता. अखेरच्या कॉलवर त्यानं आईला ६ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले होते. हे पैसे त्याच्या खात्यात आले होते. पण या पैशांचा वापर त्यानं कधीच केला नाही, अशी माहिती बँक रेकॉर्डमधून समोर आली.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा