मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं प्रचंड चर्चेत आहे. ५ जुलै २०२६ रोजी आमिर खानने त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत अत्यंत खाजगी पद्धतीने नोंदणीकृत विवाह केला. या लग्नानंतर आता आमिर खानच्या नव्या घराची आणि त्याच्या कुटुंबाची जोरदार चर्चा रंगली आहे.
आमिर खानच्या दोन पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना आणि किरण या अनेकदा एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी रीना , किरण आणि गौरी एकाच कारमधून प्रवास करताना दिसल्या होत्या. तर लेक आयराच्या लग्नात आमिर, रीना आणि किरण यांनी एकत्र येत धम्माल केली होती. आता अशी चर्चा सुरू आहे की, येत्या तीन चार वर्षात हे सगळे एकाच बिल्डिंगमध्ये राहणार आहे. त्यामुळं आमिरनं बिल्डरला १०० कोटी अॅडव्हान्स रक्कमही दिली आहे. Alok Nath in Isolation: दारुच्या व्यसनापायी सगळं गमावलं, मी टू आरोपानंतर कुठे आहेत आलोक नाथ? जवळच्या मित्राचा मोठा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खाननं आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी एक मोठा कौटुंबिक प्लॅन केला आहे. यासाठी त्यानं मुंबईच्या खार परिसरातील ‘मरिना अपार्टमेंट्स’ या पुनर्विकास होत असलेल्या इमारतीत तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अॅडव्हान्स रक्कम देऊन अनेक फ्लॅट्स बुक केले आहेत.
‘स्काय व्हिला’मध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र राहणार या नवीन हाय-राईज इमारतीमध्ये आमिर आपल्या दोन्ही माजी पत्नी, मुले आणि आई-बहिणींसह एकत्र एकाच इमारतीत वेगवेगळ्या फ्लॅट्समध्ये राहणार आहे.या इमारतीचं स्वरूप एका आलिशान ‘स्काय व्हिला’ सारखं असेल. इमारतीचं बांधकाम साधारण २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या इमारतीतील घरांचं वाटप झाल्याची माहिती आहे.
Rajiv Thakur Struggle: खोलीतला तो पिवळा बल्ब, घर सार्वजनिक शौचालयासारखं वाटायचं, आजही रडू येतं; राजीव ठाकूरनं सांगितला कठीण काळ आमिर आणि गौरी इमारतीचे सर्वात वरचे तीन मजले आमिर खान, त्याची नवीन पत्नी गौरी स्प्रॅट आणि तिचा मुलगा यांच्यासाठी असतील. तर आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता हिचा मुलगा जुनैद खान याच्यासाठी एक संपूर्ण मजला तयार केला जात आहे. आमिरची दुसरी माजी पत्नी किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद यांच्यासाठीही याच इमारतीत स्वतंत्र फ्लॅट्स राखीव ठेवण्यात आले आहेत.इतकंच नाही तर रीना दत्ता यांच्या कुटुंबाशीही आमिरचे जवळचे संबंध असून, त्यांच्याशी संबंधित कुटुंबातील सदस्यही जवळच असतील.
आमिरची आई झीनत हुसेन आणि त्याच्या दोन बहिणी (निखत आणि फरहात) यांच्यासाठीही याच इमारतीत फ्लट्स बुक करण्यात आले आहेत.
सध्या कुठं राहतंय खान कुटुंब? सध्या मरिना अपार्टमेंट्सचे बांधकाम सुरू असल्यानं, आमिर खाननं पाली हिल येथील ‘विल्नोमोना’ इमारतीत ४ लक्झरी अपार्टमेंट्स भाड्यानं घेतले आहेत. सध्या तिथं आमिर, गौरी, त्याची आई, बहिणी आणि दोन्ही मुले (जुनैद व आझाद) एकत्र राहत आहेत.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा