Headlines

Petrol 20 percent ethanol mix Maharashtra Times article; इथेनॉलचा संशयकल्लोळ


दुसरीकडे ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) आणि वाहन उत्पादक कंपन्यांनीही ‘ई२०’मुळे वाहनांना अडचणी येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, काही संस्थांच्या पाहण्यांमधून ६६ टक्के वाहनचालकांनी ‘मायलेज’ कमी झाल्याचे आणि दुरुस्तीचा खर्च वाढल्याचे अनुभव मांडले आहेत.

Petrol 20 percent ethanol mix Maharashtra Times article
पेट्रोल इथेनॉल मिक्स(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वाहनचालकांच्या तक्रारी आणि न्यायालयात सरकारने मांडलेल्या उलटसुलट भूमिकांमुळे पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे (ई२०) धोरण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडणे साहजिक आहे. एकीकडे हेच पेट्रोल अनिवार्य केल्याने वाहनांचे ‘मायलेज’ कमी होत असल्याच्या आणि वाहनांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी शेकडो ग्राहकांनी केल्या आहेत; तर दुसरीकडे सरकार आणि वाहन उत्पादक कंपन्या हे सर्व गैरसमज असल्याचे ठामपणे सांगत आहेत. केंद्रीय वाहतूकमंत्री आणि इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाचे समर्थक नितीन गडकरी यांनी ही ‘पेट्रोल लॉबी’ची पैसे देऊन चालवलेली मोहीम असल्याचा आरोप केला आहे. वाहनचालकांच्या शंका, हे पेट्रोल वापरण्याची सक्ती, ग्राहकांचे अधिकार आणि या धोरणामध्ये गुंतलेले परस्परविरोधी हितसंबंध असे अनेक पैलू या विषयाला आहेत. एकीकडे ऊर्जासुरक्षा-पर्यावरणाचे रक्षण आणि शेतीआधारित उद्योगांना आधार यांचा हवाला देण्यात येत असताना प्रत्यक्ष ग्राहकांच्या तक्रारींची पारदर्शकपणे तपासणी करून त्यांच्या शंकांचे समाधान, हाच त्यावरील एकमेव उपाय आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याची मूळ योजना या शतकाच्या प्रारंभी मांडण्यात आली. सन २०१४ पर्यंत हे प्रमाण दीड ते दोन टक्के होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सन २०१८ मध्ये आणलेल्या जैवइंधन धोरणानुसार सन २०३०पर्यंत हे प्रमाण २० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आणि पाच वर्षे आधीच – म्हणजे गेल्या वर्षी ते साध्यही केले. भारताला ८५ टक्के इंधन आयात करावे लागते आणि त्यासाठी परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्ची पडते. त्या पार्श्वभूमीवर इथेनॉलच्या मिश्रणाने या खर्चात बचत होऊ शकते; तसेच हे इंधन पर्यावरणपूरकही आहे. प्रामुख्याने ऊस आणि मक्यापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या वापरामुळे शेतकरी आणि साखर कारखान्यांनाही उपपदार्थ विक्रीतून आर्थिक आधार मिळतो. इराण युद्धात होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुंटल्याने भारतात इंधन आणीबाणी उभी राहिली होती, त्याच्याही आठवणी ताज्या आहेत. हे लाभ लक्षात घेता इथेनॉलचे मिश्रण आणि त्याचे प्रमाण वाढवण्यास कोणाचाही विरोध नसावा; परंतु काही काळापासून वाहनचालकांकडून ‘मायलेज’ दहा टक्क्यांनी घटत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. त्याबरोबरच वाहनांचे गॅसकेट, पेट्रोलवाहक नळ्या बदलाव्या लागत असून, इंजिनमध्ये कचरा किंवा टाक्यांना गंज लागून दुरुस्तीचा खर्चही वाढत असल्याचे सांगितले जाते. विरोधी पक्षांनी तर थेट गडकरी यांना लक्ष्य केले असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या कृषी उद्योगांना या धोरणाचे लाभ होत असल्याचे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी न्यायालयातील एका खटल्यात सरकारपक्षाकडून ‘२० टक्के इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग’ असा उल्लेख झाल्याने या आगीत तेल ओतले गेले. ‘ई २०’ हा अजूनही प्रयोगच असेल, तर सरकार त्याचा वापर अनिवार्य कसा करते,’ असा प्रमुख आक्षेप आहे. आपल्या मांडणीचा चुकीचा अर्थ काढल्याचा खुलासा सरकारने केला; तोवर वादाचे गाडे पुढे सरकले.

दुसरीकडे ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) आणि वाहन उत्पादक कंपन्यांनीही ‘ई२०’मुळे वाहनांना अडचणी येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, काही संस्थांच्या पाहण्यांमधून ६६ टक्के वाहनचालकांनी ‘मायलेज’ कमी झाल्याचे आणि दुरुस्तीचा खर्च वाढल्याचे अनुभव मांडले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते नव्या वाहनांबाबत तक्रारी नसल्या, तरी दहा टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलसाठी बनवण्यात आलेल्या सन २०२३ पूर्वीच्या, म्हणजे जुन्या वाहनांना अडचणी येत आहेत, त्याचाही विचार झाला पाहिजे. युरोप-अमेरिकेतील अनेक देश पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर करतात; मात्र ब्राझीलसारख्या इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये आघाडीवरच्या देशात ग्राहकांना शंभर टक्के पेट्रोल किंवा इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या अधिकारांचा विचार केला, तरी तशी व्यवस्था आपल्याकडे उभी करणे शक्य आहे का, हासुद्धा मुद्दा आहेच. मोदी यांच्या तिन्ही कार्यकाळांमध्ये गडकरी हे मंत्रिमंडळात महत्त्वाच्या स्थानी पाय रोवून आहेत. इतकेच नव्हे, तर मोदी यांना पर्यायाची चर्चा होते, तेव्हा सर्वपक्षीय दोस्ताना असलेल्या ‘नागपूर’च्या गडकरींचे नाव हमखास निघते. त्या पार्श्वभूमीवर येऊ घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचीही पार्श्वभूमी या वादामागे असू शकते. काहीही असले, तरी एकीकडे ८५ टक्के इथेनॉल वापराचे तंत्रज्ञान दारी उभे आहे; अशा काळात सर्वंकष खुल्या अभ्यासाद्वारे सर्वसामान्य ग्राहकांच्या शंकांचे निरसन केल्याशिवाय पुढे पावले टाकणे हिताचे नाही.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा