Vasai Virar Rain News : हवामान विभागाने दिलेल्या मंगळवारी विविध भागांसाठी दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने मुसळधार पाऊस, तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर स्थानिक प्रशासनांनी सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे.

कमरेइतक्या पाण्यातून पुन्हा घर गाठावे लागले
पाणी हळूहळू ओसरत असून, काही वेळातच रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरू होईल, असे प्रशासकडून सांगण्यात आले. प्रशासनातर्फे सोमवारी पावसाचा ‘रेड ॲलर्ट’ जाहीर करण्यात आला होता. तरीही नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर कमरेइतक्या पाण्यातून पुन्हा घर गाठावे लागले. वसई स्थानकात अनेक लोकलगाड्या रुळांवरच अडकून पडल्या. विरार स्थानकात ‘वडोदरा एक्स्प्रेस’ थांबवून ठेवावी लागली. विरारच्या पुढे सफाळा आणि पालघर स्थानकांदरम्यानही रुळांवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक पूर्णपणे खोळंबली.
Nashik Red Alert : ढगफुटीचा इशारा, खबरदारीचा पुकारा; नाशिकला रेड अलर्ट, शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, आपत्कालीन स्थितीत कुठे संपर्क करणार?
महानगरपालिकेच्या नियोजनावर नागरिकांचा तीव्र संताप
चर्चगेट ते वसईदरम्यानची सेवा कशीबशी सुरू असली, तरी या मार्गावर गाड्या अत्यंत विलंबाने धावत होत्या. वसई ते नालासोपारादरम्यान रेल्वेरुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारनंतर पूर्णपणे बंद झाली. शहरांतर्गत रस्ते वाहतूक आधीच बंद असल्याने प्रवाशांकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे संतप्त आणि हताश झालेल्या नागरिकांनी वसई ते नालासोपारा आणि नालासोपारा ते विरार दरम्यान थेट रेल्वेरुळांवरूनच पायी प्रवास सुरू केला. पाऊस आणि साचलेल्या पाण्यात ही पायपीट अत्यंत धोकादायक ठरत आहे. दरवर्षी पावसाळ्यात नालासोपारा आणि विरार परिसराची हीच अवस्था होत असल्याने रेल्वे प्रशासन आणि स्थानिक महानगरपालिकेच्या नियोजनावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रस्त्यावरील पाण्यात मके धुतले
रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात मके धुणाऱ्या ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील विक्रेत्याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या विक्रेत्याला मारहाण केली, तसेच ठाणे महापालिकेच्या पथकाने त्याच्यावर बडगा उगारला.
Lonavala News : लोणावळ्यात कलम 163 लागू, मुसळधार पावसाने संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध लागू
पालघरमध्ये पूरसदृश स्थिती
गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीवर पालघर जिल्हा प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून मदत, बचाव व पुनर्वसनाची कामे युद्धपातळीवर सकाळपासून सुरू करण्यात आली आहेत. ६ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजेपर्यंत, जिल्ह्यात सरासरी १३२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. डहाणूतील शेणसरी येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. माहीम-केळवा लघु पाटबंधारे धरणाची पाणी साठवण क्षमता १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे. झांजरोळी धरणाला तडे गेले असून या ठिकाणी सूर्या पाटबंधाराचे कार्यकारी अभियंता व सहकारी धूप थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
JNPA Accident : वाऱ्याचा वेग एवढा की थेट भलंमोठं कंटेनर कोसळलं, कामगार दबले, एकाचा मृत्यू, दोन जखमी
घोडबंदर ते मिरा-भाईंदर… तीन तास
ठाणे-घोडबंदर रोडवर मिरा-भाईंदरकडे येणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यासह मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनांचा वेग मंदावला. परिणामी कोंडीमुळे सोमवारी सकाळी घोडबंदर रोड ते मिरा-भाईंदर अशा अवघ्या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल तीन लागले. ठाणे-घोडबंदर रोडवर कर्पे कंपाउंडजवळ लाकडाचे ओंडके वाहून नेणारा ट्रक सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उलटला.

