Headlines

Raigad Heavy Rain Flood Water Enter in Pali Ballaleshwar Temple


मुसळधार पावसाचा फटका आता प्रसिद्ध देवस्थानांदेखील बसत आहे. रायगडमध्ये जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पाणीच पाणी बघायला मिळत आहे.

raigad news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : मुसळधार पावसामुळे पाली येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर मंदिरात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. मंदिरासमोरील पूर्व भागात असलेल्या ओढ्याला (ओव्हळ) पूर आल्याने हे पाणी ओसंडून थेट मंदिरात आणि आजूबाजूच्या परिसरात शिरले. या घटनेमुळे मंदिराचा सभामंडप जलमय झाला असून भाविक आणि कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

काही दिवसांपूर्वी पाली नगरपंचायत प्रशासनाकडून या ओढ्याची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने हा ओढा अधिक खोल केला असता तर पाण्याचा निचरा वेगाने झाला असता आणि मंदिरात पाणी शिरण्याची ही परिस्थिती कमी प्रमाणात ओढवली असती, असे बोलले जात आहे.

प्रशासनाची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या घटनेनंतर बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले की, पूर ओसरताच मंदिर प्रशासनाकडून मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या भागाची स्वच्छता लागलीच करण्यात येईल.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पेणमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत सरासरी ७६.२१ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पेण तालुक्यात सर्वाधिक १२५ मिमी पाऊस झाला असून सुधागडमध्ये ११० मिमी, श्रीवर्धनमध्ये १०६ मिमी, खालापूरमध्ये १०० मिमी आणि माणगावमध्ये ८८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अंबा नदी धोक्याच्या पातळीवर

सततच्या पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी गाठली असून कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. हेटवणे मध्यम प्रकल्पात ३८.८२ टक्के जलसाठा झाला असून जिल्ह्यातील २८ लघुप्रकल्पांपैकी ११ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

११ गावातील नागरिकांना सुरक्षितस्थली हलवले

पूराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आतापर्यंत ११ गावांतील १६० कुटुंबांमधील ५६९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची पथके सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पावसाने १८९ घरांचे झाले नुकसान

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत १८९ घरांचे नुकसान झाले असून चार गोठे बाधित झाले आहेत. रोहा तालुक्यातील बालसई येथील एका मंदिराचे नुकसान झाले असून महाड तालुक्यातील विहेरे सुतारकोंडे येथील शाळेलाही फटका बसला आहे. याशिवाय दोन जणांचा मृत्यू, एका व्यक्तीला गंभीर दुखापत आणि एक व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. तसेच एका बैलासह दोन गायींचा मृत्यू झाल्याने पशुधनाचेही नुकसान झाले आहे.

वाहतुकीवरही परिणाम

वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. नागोठणे–रोहा मार्गावरील भिसे खिंडीत झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, यंत्रणांनी तत्काळ रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली. पाली–वाकण मार्ग अद्याप बंद असून मुंबई–गोवा महामार्गावरील सुकेळी परिसरातील वाहतूक पूर्ववत सुरू आहे. रेल्वे सेवाही सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाचं मोलाचं आवाहन

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी, ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अंतिम आकडेवारी पुढील अहवालात स्पष्ट होणार आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवल्याने प्रशासनासह नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा