Headlines

Solapur ZP School Principal Ended Life of Wife Two Children And Himself


सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेअर मार्केटमध्ये कोट्यावधी रुपयांचा तोटा झाल्याने नैराश्यात गेलेल्या मुख्याध्यापक शिक्षकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या मुख्याध्यापक शिक्षकाने बायको आणि दोन्ही मुलांना ठार करून स्वतः ला देखील संपवलं आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

Solapur News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकाने शेअर मार्केटमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील वैराग येथील हत्तीज येथे घडली आहे. मुख्याध्यापकाने दोन मुले, पत्नीला संपवून स्वतः ला संपवल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. योगेश बाळासाहेब पाटील असं या मुख्यध्यापकाचे नाव आहे. योगेश पाटील यांना शेअर मार्केटमध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने, त्यांनी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. सामूहिक आत्महत्यामध्ये योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत.

बार्शी तालुक्यातील हत्तीज गावातील धक्कादायक घटना घडली आहे. योगेश बाळासाहेब पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांना 1 कोटी 80 लाख रुपये कर्ज झाले. या कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

22 पानांची चिठ्ठी सापडली

योगेश बाळासाहेब पाटील (वय 41 वर्षे) यांनी आत्महत्या करण्या अगोदर 22 पानांत सविस्तर लिहिले आहे. शेअर मार्केटमध्ये कसा फायदा झाला, नुकसान कसा झाला, याबाबत योगेश पाटील यांनी सविस्तर लिहिले आहे. शेअर मार्केटमध्ये नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले, ते परत करता आले नाही, त्याबाबत योगेश पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे.

कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन न झाल्याने योगेश पाटील यांनी सुरुवातील पत्नी माधुरी, अथर्व आणि शिवांश यांना विष पाजले, आणि स्वतः ही विष प्राशन करून गळफास घेत आत्महत्या केली आहे. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी अधिकृतरित्या माहिती दिली आहे. सामूहिक आत्महत्येनंतर या संपूर्ण बार्शी तालुक्यावर आणि सोलापुरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर कोणत्याही गोष्टीच्या आपण किती आहारी जावं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरंतर शेअर मार्केटची उत्तम माहिती असेल तर त्यात गुंतवणूक करण्यात काहीच वाईट नाही. पण गुंतवणूक करत असताना त्याचा चांगला अभ्यास करणं अपेक्षित आहे. यासोबतच आयुष्य संपवणं हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. आपल्यासह आपल्या कुटुंबाचादेखील जीव घेणं हे योग्य नाही. योगेश पाटील यांनी नैराश्यात जावून हे टोकाचं पाऊल उचललं. पण अशा परिस्थिती कधीही नैराश्यात न जाता, त्यापासून मार्ग काय निघेल याचा विचार करुन मार्ग काढणं अपेक्षित आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा