Headlines

Chhatrapati Sambhajinagar Police Damini Pathak Stop child marriage 17-year-old bride threatens family with elopement


पळून जाऊ असा दम देणाऱ्या नवरीला दामिनी पथक येताच कापरं भरलं. यावेळी नवरदेव-नवरीने धूम ठोकली. प्रचंड हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आलं.

damini pathak action in chhatrapati sambhajinagar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “माझं सचिनसोबत लग्न लावून द्या, नाहीतर आम्ही पळून जाऊ”, असा थेट घरच्यांना दम देणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन नवरीला लग्नगाठ बांधण्यापूर्वीच दामिनी पथकाची एन्ट्री होताच चांगलंच कापरं भरलं. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात शुक्रवारी या बालविवाहाच्या मांडवात अभूतपूर्व हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोलिसांची गाडी येताच नवरीच्या वेशभूषेतील मुलगी आणि नवरदेवाने लग्न मंडपातून थेट धूम ठोकली. अखेर दीड तासाच्या थरारानंतर पोलिसांनी दोघांना शोधून काढत हा बालविवाह यशस्वीपणे रोखला.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरातील एका गरीब कुटुंबातील १७ वर्षांची समीक्षा (नाव काल्पनिक) नुकतीच १० वीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तिचे वडील प्लंबिंगचे काम करतात तर आई परिसरामध्ये धुण्या-भांड्याचे काम करते. समीक्षाचे तिच्या आत्याचा मुलगा सचिन (नाव काल्पनिक आहे) वय २३, व्यावसायिक- प्लंबिंग याच्याशी प्रेमसंबंध होते. १० वी पास होताच समीक्षाने घरात लग्नाचा तगादा लावला. सुरुवातीला पालकांचा विरोध होता, मात्र लग्न लावून नाही दिलं तर पळून जाऊ, असा दमच समीक्षाने दिल्याने गरीब पालकांनी अखेर हार मानली. बुधवारी दोघांना हळद लागली आणि आज शुक्रवारी विवाहाचा मुहूर्त होता.

नातेवाईकांचा वास्तूशांतीचा बनाव; वय निघालं १७ वर्ष

शाळेच्या मैदानावर विवाहाची जय्यत तयारी झाली होती. नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते, जेवणाचा बेतही तयार होता. मात्र, एका जागरूक नागरिकाने पोलिसांच्या कंट्रोल रूमला तिथे बालविवाह होत असल्याची टीप दिली. माहिती मिळताच दामिनी पथक आणि अंगणवाडी सेविका आरती काळे आणि रंजना निकाळजे मंडपात पोहोचल्या. पोलिसांना पाहताच नातेवाईकांनी आमच्या घरात वास्तूशांतीचा कार्यक्रम आहे, असा खोटा बनाव रचला. मात्र, पथकाने नवरीच्या वेशभूषेतील मुलीचे वय तपासण्यासाठी ओळखपत्राची मागणी केली. तेव्हा तिच्या वयाचा अधिकृत पुरावा तपासला असता, तिचे वय अवघे १७ वर्ष असल्याचे उघड झाले.

पोलीस येताच नवरदेव-नवरीने ठोकली धूम

आपलं बिंग फुटल्याचं आणि पोलीस आता कारवाई करणार याची कुणकुण लागताच, लग्नाचा हट्ट धरणारी समीक्षा आणि नवरदेव सचिन या दोघांचीही बोलती बंद झाली. त्यांनी मंडपातून थेट धूम ठोकली आणि ते लपून बसले. तब्बल एक ते दीड तास हे नवविवाहित जोडपे अज्ञात स्थळी लपून होते, ज्यामुळे मंडपात एकच गोंधळ उडाला. अखेर दामिनी पथकाने नातेवाईकांना कायदेशीर कारवाईची भीती दाखवून विश्वासात घेतले आणि समजावून सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी संपर्क करून त्या दोघांना पुन्हा मंडपात बोलावले.

दामिनी पथकाने दोन्ही बाजूच्या आई-वडील आणि मुला-मुलीला बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार समज दिली. आपली चूक उमजल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तिचा विवाह लावून देऊ, असे लेखी आश्वासन प्रशासनाला दिले.

हा बालविवाह रोखण्यात पोलीस उपनिरीक्षक पीएसआय मिरधे, यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, महिला पोलीस सुनिता नागलोद, मोनिका दीवे,कल्पना नागरे आणि पोलीस शिपाई संकपाळ तसेच महिला व बालविकास समितीच्या/प्रकाश नगरच्या अंगणवाडी सेविका आरती काळे व रंजना निकाळजे यांच्या पथकाने हा बालविवाह थांबवण्याची मोठी कामगिरी केली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा