Headlines

Yavatmal Pandharkawada A Partially Burnt Body was Washed Away in a Flood; अंत्यसंस्कारादरम्यान पूर, मृतदेह गेला वाहून! नातेवाईकांकडून शोध सुरू, अधिकारी म्हणतात, ‘आम्ही फक्त…’


Yavatmal News : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर दिलंय.

Yavatmal Half burnt body washed away flood
अर्धवट जळालेला मृतदेह वाहून गेला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
आरती गंधे, यवतमाळ : अंत्यसंस्कार सुरू असताना नाल्याला आलेल्या पुरात अर्धवट जळालेला मृतदेह (Deadbody) वाहून गेला. दोन दिवसांपासून शोध घेत असतानाही मृतदेह सापडत नसल्याने नातेवाइकांनी शासकीय अधिकाऱ्यांना (Yavatmal) मदत मागितली. पण, ‘जिवंत माणूस वाहून गेल्यास आम्ही त्याचा शोध घेतो. मृतदेहाचा शोध घेणे नियमात बसत नाही,’ असे अधिकाऱ्यांनी ठणकावले. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या मोबाइलसाठी 22 तास शोध मोहीम राबविण्यात आली होती.

यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील लहान पांढरकवडा येथे 13 सप्टेंबरला ही घटना घडली. गावातील कौशल्याबाई महादेव कोंडेकर (वय 55) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने कुटुंबीयांनी जवळच्या नाल्याच्या काठावर अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. गावकरी नाल्याच्या काठावर अंत्यविधीसाठी एकत्र आले.

Maharashtra TimesRaigad Crime : नौदल अधिकारी सुरजसिंह यांचा मृतदेह अखेर सापडला, आठ दिवसांपासून होते बेपत्ता; पोलिसांना वेगळाच संशय

अंत्यसंस्कार सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने कोंडेकर कुटुंबीय आणि गावकरी घरी परत गेले. मात्र या पावसाने नाल्याला क्षणात पूर आला. काठावरील अर्धवट जळालेला मृतदेह देखील वाहून गेला. पाऊस थांबल्यावर अंत्यविधी पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय परतले. नाल्याच्या काठावर मृतदेह दिसून आला नाही. त्यांनी गावात येऊन माहिती दिली. गावकऱ्यांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. बराच शोध घेऊनही मृतदेह सापडत नसल्याने गावकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन मदतीसाठी विनवणी केली. पण, पुरात वाहून गेलेल्या मृतदेहाचा शोध शोध शासकीय यंत्रणा घेत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. सोमवारीही गावकरी दिवसभर मृतदेहाचा शोध घेत होते.

गावाला स्मशानभूमी नाही

गावाजवळून वाहणारा नाला जंगलात जात असल्याने मृतदेह शोधण्यात अडचण येत आहे. मुळात अनेक वर्षांपासून गावाजवळ स्मशानभूमी असावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. काही वर्षांपूर्वी गावातील एका व्यक्तीने स्मशानभूमीसाठी जागा दिली होती. त्यात काही अडचण निर्माण झाल्याने प्रश्न कायम राहिला.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Rain : संभाजीनगरात पावसाचा कहर! अनेक गावांना पुराचा तडाखा, शेतीमध्ये पाणीच पाणी; विदारक चित्र

शेतीमध्ये पाणीच पाणी; विदारक चित्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ६ तास वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदस्य पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. यात केळगाव, आधारवाडी, तांडा, कोहळा या गावांना याचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह माती वाहून गेली यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा