Headlines

Pune Cab Driver Vaibhav Jadhav reveals Siya Goyal actions before Pre Wedding Bali trip Ketan Agarwal Passport stolen Crime News; व्हिडिओ कॉल करुन दाखव मला, केतनचा टॅक्सी चालकाला फोन; सिया-साहिलची भांडणं ते फूड मॉलवरील अजब प्रकार, वैभव जाधव काय म्हणाला?


Pune Lohagad Ketan Agarwal Death : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करत असताना सियाने चहासाठी एका ‘फूड मॉल’जवळ गाडी थांबवायला सांगितली. साधारण १० मिनिटांनंतर ती गाडीजवळ परत आली आणि तिने मला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले, असे टॅक्सी चालक वैभव जाधव म्हणाला

Pune Lohagad Ketan Agarwal Siya Goyal Cab Driver Vaibhav Jadhav Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पुढे सरकत असतानाच बाली ट्रिपवेळी केतन-सियासह चौघांना पुण्याहून मुंबईला नेणाऱ्या टॅक्सी चालकाने महत्त्वाचा दावा केला आहे. मुंबई विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच सिया गोयलने त्याला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडी थांबवायला सांगितली; त्यानंतर तिने गाडीची डिक्की उघडली आणि आपल्या पर्समधून काहीतरी बाहेर काढले. विशेष म्हणजे नंतर केतनचा पासपोर्ट गायब असल्याचे आढळून आले होते.

टॅक्सी चालक वैभव जाधव याने केतन-सियासह चौघांनी ६ जून रोजी पुण्याहून मुंबईला केलेल्या प्रवासाचा तपशील सांगितला. बाली येथे ‘प्री-वेडिंग शूट’ला जाण्यापूर्वी केतनचा पासपोर्ट गायब झाल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच टॅक्सी चालकाच्या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

टॅक्सी चालकाने काय सांगितले?

६ जूनला सकाळी १० वाजताच्या सुमारास पुण्यात बिबवेवाडीहून सिया-साहिल टॅक्सीत बसले. सुरुवातीला सियाने कॅबमध्ये बसण्यासच नकार दिला होता, परंतु तिचा भाऊ साहिल याने तिला बळजबरीने गाडीत बसवले. त्यांचे आई-बाबा म्हणाले सावकाश जा. आम्ही निघालो. साहिलने गाणी लावायला दिली आणि तो पुढे येऊन बसला. त्यानंतर ही कॅब रावेत येथे पोहोचली. साहिलने सांगितलं की १०-१५ मिनिटं थांबा आम्ही आलो. काही वेळाने सहा जण खाली आले. सिया-साहिलच्या सोबत केतन अग्रवाल आणि त्याची बहीण गाडीत येऊन बसले, असे वैभवने सांगितले.
Maharashtra TimesMumbai Muharram Poison Plot : पत्नी सोडून गेली, समाजाबद्दल द्वेष; फय्याज 15000 मुंबईकरांच्या जीवावर उठला, सलमानच्या सतर्कतेने अनर्थ टळला
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करत असताना सियाने चहासाठी एका ‘फूड मॉल’जवळ गाडी थांबवण्यास सांगितले. साधारण १० मिनिटांनंतर ती गाडीजवळ परत आली आणि तिने त्याला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले. तिने गाडीच्या डिक्कीत असलेल्या आपल्या पर्समधून काहीतरी बाहेर काढले. आणखी १५ ते २० मिनिटांनंतर सगळ्यांनी मला गाडीकडे परत बोलावले आणि मुंबई विमानतळाच्या दिशेने प्रवास पुन्हा सुरु झाला, असे वैभव म्हणाला.

मी सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर सोडले. त्यानंतर साधारण दोन मिनिटांनी मला एक फोन आला, की टॅक्सीमध्ये एक लहान बॅग राहिली आहे. तो त्यावेळी सुमारे २०० मीटर अंतरावर होता आणि त्याने ती बॅग परत आणून दिली.

कट्टर मित्रांच्या राजकीय वाटा बदलल्या; ओमराजेंविरोधात कैलास पाटील मैदानात

केतनचा वैभवला व्हिडिओ कॉल

आणखी ५०० मीटर गाडी चालवल्यानंतर मला पुन्हा एक फोन आला, आता केतनचा पासपोर्ट कॅबमध्येच राहिल्याचे मला सांगण्यात आले. मी आधीच गाडी तपासली होती आणि पासपोर्ट आत नसल्याचे त्यांना कळवले होते. मात्र त्यांनी मला कॅबच्या आतील भाग दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले, तरीही पासपोर्ट सापडला नाही.

मला विमानतळावर परत येण्यास सांगण्यात आले, तिथे साहिल आणि केतन यांनी स्वतः कॅबची झडती घेतली. गाडीची तपासणी करुनही पासपोर्ट सापडला नाही. झडतीनंतर सगळेच विमानतळावरुन निघून गेले.

सिया-साहिलचा वाद

पुण्याहून रावेतला केतन बसेपर्यंत संपूर्ण वेळ सिया आणि तिचा भाऊ साहिल यांच्यात वाद सुरु होता. सियाने गाडीची डिक्की उघडायला सांगून त्यातून काहीतरी काढले होते; मात्र ती वस्तू नेमकी काय होती, हे आपल्याला माहित नसल्याचे वैभवने नमूद केले.

केतन अग्रवाल याच्या मृत्यूच्या काही आठवडे आधी बालीची नियोजित ‘प्री-वेडिंग’ ट्रीप रद्द करण्यास भाग पाडणारा ‘हरवलेला पासपोर्ट’ आता तपास अधिकारी या हत्येच्या कटातील अत्यंत महत्त्वाची कडी मानत आहेत.
Maharashtra TimesMayank Lohar : मयंकचा जीव धोक्यात, बाकीच्या प्रवाशांनी रोशनला धरलं का नाही? सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षदर्शीने दिलं; डब्यात एकच गोंधळ उडाला
यापूर्वीच, पुणे ग्रामीण पोलिसांनी असेही म्हटले होते की, सिया गोयल हिने केतनचा पासपोर्ट चोरुन नष्ट केला होता, त्यामुळे सर्वांना परदेशात जाण्यापासून परावृत्त व्हावे लागले. ही काही केवळ एक स्वतंत्र घटना नव्हती, तर एका व्यापक कटाचा भाग होता, ज्याचा शेवट अखेरीस लोहगड किल्ल्यावरुन ढकल्यामुळे केतनचा मृत्यू होण्यात झाला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा