CM devendra fadnavis clear stance on manoj jarange patil maratha reservation; जरांगेंकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा; फडणवीसांनी घेतली रोखठोक भूमिका
CM devendra fadnavis clear stance on manoj jarange patil maratha reservation; जरांगेंकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा; फडणवीसांनी घेतली रोखठोक भूमिका
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मेळावे घेऊ नयेत, तसेच मेळावा उधळून लावण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित असून ते आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. यापूर्वीही सरकारने विविध प्रश्नांवर मार्ग काढला असून पुढेही चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, जे काही आंदोलन चालले आहे, त्या आंदोलनामध्ये चर्चा करण्याकरता सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, ते चर्चा करणार आहेत, यापूर्वीही आपण प्रत्येक गोष्टीचा मार्ग काढला आहे, आणि पुढेही आपण मार्ग काढणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या प्रक्रियेमध्ये सुरवातीपासून अतिशय संवेदनशीलतेने काम करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जरांगे पाटील यांनी जातपडताळणी समित्या रद्द करण्यासह विविध मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवरही सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक आणि नागरिकांच्या मदतीबाबतही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. आपले हे कर्तव्यच आहे की, आपले प्रवासी जिथे अडकले असतील त्यांना बाहेर काढणे. नवीन भारत तयार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिकवण दिली आहे की, कुठेही अडचणीत भारतीय असेल तर त्याला मदत पोहोचली पाहिजे. महाराष्ट्रातील जे लोक तिथे आहेत, त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी मदत केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची पाहणी केली. त्यांनी सफारी केल्यानंतर वन विभागाची आढावा बैठक घेतली. गोरेवाडा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. इंडियन सफारीनंतर पुढील वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. आफ्रिकन सफारी हे गोरेवाड्याचे मुख्य आकर्षण ठरणार असून ‘बिग फाईव्ह’ म्हणून ओळखले जाणारे प्राणी येथे पाहायला मिळतील, तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआयच्या माध्यमातून अर्ली वॉर्निंग सिस्टिम विकसित करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. विविध प्राण्यांकडून मिळणारे संकेत आणि कॅमेरा ट्रॅपसह अन्य तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करून नागरिकांना वन्यप्राण्यांच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा