Sonal Dinusha Batting Against India : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या सोनल दिनुशाने सामन्यानंतर आपल्या कामगिरीमागचं श्रेय कोणाला दिलं? ४२० धावा आणि तीन शतकांनंतर श्रीलंकेच्या या फलंदाजाने नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. मात्र, दुसऱ्या कोलंबो कसोटीत टीम इंडियाला विजयाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ पाचव्या दिवशी सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. पण, श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा टीम इंडियाच्या मार्गात एक मोठा डोंगर बनून उभा राहिला. त्याने शानदार शतक ठोकत सामन्याचे चित्रच पालटले आणि सामना अनिर्णित राखत तो श्रीलंकेचा नवा हिरो ठरला आहे. या सामन्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“भारताविरुद्ध धावा काढणं हे माझं भाग्य”
सोनलने या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके झळकावली. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “मला वाटतं, मी आज ज्यांच्यामुळे धावा काढू शकलो, त्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत. विशेषतः माझे कोचिंग स्टाफ, स्कूल कोच, प्रांतीय कोच, माझे कुटुंब आणि मित्र यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. तयारीबाबत सांगायचे तर, इथल्या खेळपट्टीवर फिरकीला मोठी मदत मिळते, याचा मला अंदाज होता. त्यामुळे मी सरावादरम्यान अत्यंत बारकाईने सराव केला आणि म्हणूनच मला या धावा करता आल्या.”
सोनल दिनुशाने कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात १६२ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने आपला हा खणखणीत फॉर्म कायम ठेवत २६४ चेंडूंचा सामना करत नाबाद १३३ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. दुसऱ्या डावात भारताचा एकही गोलंदाज त्याला बाद करू शकला नाही आणि त्याने एकाकी झुंज देत सामना ड्रॉ केला. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात १०० आणि दुसऱ्या डावात ८४ धावांचे मोठे योगदान दिले होते. आपल्या या अफाट टॅलेंटची दखल त्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला घ्यायला भाग पाडले आहे.
या सामन्यात टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी १३८ षटकांत ९ बाद ५०३ धावांचा डोंगर उभारत आपला पहिला डाव घोषित केला होता. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा पहिला डाव ८९.४ षटकांत २९० धावांवर आटोपला. भारताने २१३ धावांची मोठी आघाडी घेत श्रीलंकेला फॉलोऑन दिला. पण, दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांनी, विशेषतः सोनल दिनुशाने चिवट झुंज देत १५४ षटकांत ९ बाद ४२९ धावा केल्या आणि भारताच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून सामना अनिर्णित राखला.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा