Headlines

पत्नीच्या भेटीगाठीच्या संशयातून वाद विकोपाला, कुख्यात बदमाशाला संपवलं, पोलिसांनी आरोपीच्या फिल्मी स्टाईल नांग्या ठेचल्या


नागपुरात एका कुख्यात बदमाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पत्नीच्या भेटीगाठीच्या संशयावरुन वाद विकोपाला गेला आणि त्यात तरुणाला संपवण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीची दीड किलोमीटरपर्यंत फिल्मी स्टाईल पाठलाग करत अटक केली.

Nagpur News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूरच्या नरेंद्रनगर पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी जुन्या वादातून कुख्यात बदमाशाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे. गौरव पंकज रगडे (वय २५) असे मृताचे नाव आहे. गौरव रामभाऊ राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर पसार होणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी तब्बल दीड किलोमीटर पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक गौरव रगडे आणि आरोपी गौरव राऊत या दोघांविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. रगडे हा नुकताच एका हत्या प्रकरणात जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. दरम्यान, गौरव राऊत आणि गौरव रगडेच्या पत्नीची छत्रपती चौक परिसरात ‘क्लाउड किचन’ नावाने रेस्टॉरंट सुरू करण्याची तयारी सुरू होती. यासाठी गौरव राऊतने परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. गौरव राऊत आणि त्याचा पत्नीच्या भेटीगाठींबाबतची माहिती गौरव रगडेला मिळाल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

रगडेला संशय, गौरव राऊतच्या घरी गेला

गुरुवारी रगडेला त्याची पत्नी गौरव राऊतच्या खोलीत असल्याचे संशय होते. त्यामुळे गौरव रगडे हा गौरव राऊत राहत असलेल्या खोलीत पोहोचला. त्यावेळी गौरव राऊत आपल्या काही मित्रांसोबत दारू पित होता. दारूच्या नशेत रगडेने गौरव राऊतला शिवी दिली. तसेच खोलीत तोडफोड करून काचा फोडल्या. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

राऊतने रगडेला संपवलं

हाणामारीनंतर गौरव रगडे तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. राऊतने त्याचा पाठलाग केला. नरेंद्रनगर पुलाजवळ गौरव रगडे खाली पडताच राऊतने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर जखमी झालेला रगडे घटनास्थळीच कोसळला. त्यानंतर आरोपी तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला.

पोलिसांनी पसार होणाऱ्या आरोपीला पकडलं

याचदरम्यान अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मनीष भलमे आणि नरेश सावनकर परिसरात गस्तीवर होते. घटनेची माहिती मिळताच दोघेही घटनास्थळी दाखल झाले. मनीष भलमे घटनास्थळी थांबले, तर नरेश सावनकर यांनी पसार होणाऱ्या आरोपीचा पाठलाग सुरू केला. तब्बल दीड किलोमीटर पाठलाग केल्यानंतर त्यांनी गौरव राऊतला पकडले. त्याच्याकडून हत्येत वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. या घटनेचा तपास सुरू असून, हत्येमागे अन्य कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, ज्या ठिकाणी वादाची सुरुवात झाली तो परिसर अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मात्र नरेंद्रनगर पुलाजवळील हत्येचे ठिकाण बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या थरारक घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा