Baldev Puri On Bollywood Couple : डिटेक्टिव्हनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड जोडप्याबद्दल खुलासा केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नसतं. अनेकदा कलाकरांच्या आयुष्यातील रहस्य उघड होतात. यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये एकमेकांना फसवणाऱ्या जोडप्यांचा समावेश असतो. अशातच आता डिटेक्टिव्ह बलदेव पुरी यांनी अशाच एका जोडप्याबद्दल सांगितलं आहे.
बॉलिवूड जोडप्याची पोलखोल
डिटेक्टिव्ह बलदेव पुरी यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत एका अभिनेता जोडप्याबद्दल सांगितलं. या जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सुखी नव्हतं. अभिनेत्रीच्या भावानं त्यांच्याशी संपर्क साधलेला आणि त्यानं सांगितलं की, त्याच्या बहिणीला असं वाटतंय की, तिचा मोबाईल फोन हॅक झाला आहे. बलदेव यांनी सांगितलं की, त्या अभिनेत्याचं स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस देखील होतं आणि तो व्यावसायिक व्यवहारांसाठी अभिनेत्रीची बनावट सही करायचा.
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
डिटेक्टिव्ह बलदेव पुरी म्हणाले, ‘अभिनेता त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून पैसे काढून वैयक्तिक गुंतवणुकीत गुंतवत होता. त्या अभिनेत्यानं आपल्या पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ती दिवसभर कोणाला भेटते हे पाहण्यासाठी दोन लोकांना कामावर ठेवलं होतं. अभिनेत्यानं पत्नीच्या गाडीत एक जीपीएस बसवलं आहे. त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक रेकॉर्डरही बसवलेला होता.’ बलदेव यांनी पुढे सांगितलं की, त्या अभिनेत्रीला तो रेकॉर्डर सापडला आणि तिनं तो मला आणून दिला. त्यातून आम्हाला माहिती मिळाली.
Vijay Nikam : ‘मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो’, सिनेमासाठी विकली जमापुंजी, डोक्यावर लाखोंचं कर्ज; मराठी अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ ‘अभिनेत्रीला समजताच तिनं खूप गोंधळ घातला. ती त्याच्यावर ओरडत होती. ‘माझी खोटी सही करायची तुझी हिंमत कशी झाली? तू स्वतःला समजतोस तरी कोण?’ गुप्तहेर क्लायंटला रेकॉर्डिंग करण्याचा सल्ला देऊ शकतात, पण ते स्वतः कुठेही रेकॉर्डर लावू शकत नाहीत, असं बलदेव यांनी सांगितलं. ‘त्या अभिनेत्याकडे खूप पैसा होता, तरीही प्रॉडक्शन हाऊससाठी त्याला पत्नीच्या सहीची गरज होती. त्यानंतर त्यांनी आपापसात सेटलमेंट करायचं ठरवलं. मग अभिनेत्रीचं नाव सर्व कायदेशीर कागदपत्रांमधून काढलं. आता ते प्रॉडक्शन हाऊस तो अभिनेताच चालवतो आणि ते दोघे अजूनही एकत्र राहत आहे.’ असंही बलदेव म्हणाले.
Suresh Oberoi : ‘मित्राच्या सांगण्यावरून मी भाजपमध्ये प्रवेश केलेला, राजकारणात खोटेपणा जाणवत होता’, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य बलदेव यांनी सांगितलं की, अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकांची सतत फसवणूक करायचे. ‘तो अभिनेता इतरांकडून फेव्हर घ्यायचा आणि इतरांना फेव्हर द्यायचा. फेव्हर म्हणजे शारीरिक संबंध. एवढंच नव्हे तर त्या अभिनेत्रीचेही इतरांसोबत संबंध होते. तिच्या नवऱ्यालाही याबद्दल माहित होतं. या जोडप्याचे आठ हाय-प्रोफाईल मित्र होते आणि अभिनेत्रीचे यापैकी तीन जणांसोबत संबंध होते. पती परदेशातही फेव्हर घ्यायचा. हे पत्नीलाही माहीत होतं. आम्ही तिला त्याचा पुरावाही दिला आहे. हे प्रकरण करोनानंतरचं असून या जोडप्याला मोठी मुलं आहेत.’ असं बलदेव शेवटी म्हणाले.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा