भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे थेट तक्रार केली आहे. ‘बोलण्यासाठी दुप्पट वेळ, तरीही अन्यायाची ओरड’ असा सवाल गणेश बिडकरांनी मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रशांत अहेर, पुणे : पुणे महापालिकेतील महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर जाहीर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्यावर भाजपने निधीच्या माध्यमातून राजकीय ‘दणका’ दिला आहे. दोन्ही नगरसेवकांचा निधी शून्य करण्यात आला असून, या कारवाईची माहिती देत भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे थेट तक्रार केली आहे.
बालवडकर आणि टिंगरे यांच्या प्रभागातील निधी शून्य करण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावरील सातत्यपूर्ण टीकेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचे बिडकर यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. मात्र, दोन्ही प्रभागांतील सर्वसामान्य पुणेकरांच्या विकासकामांना या निर्णयाचा फटका बसू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बोलू दिले जात नाही आणि निधी दिला जात नाही, या आरोपांनाही बिडकर यांनी आकडेवारीच्या आधारे प्रत्युत्तर दिले आहे. फेब्रुवारी ते जुलै २०२६ या कालावधीत मुख्य सभेत भाजपच्या १२६ सदस्यांना १,१६० मिनिटे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ सदस्यांना ५०६ मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली. म्हणजेच भाजपच्या एका सदस्याला सरासरी नऊ मिनिटे, तर राष्ट्रवादीच्या एका सदस्याला १८ मिनिटे वेळ मिळाल्याचा दावा बिडकर यांनी केला आहे. त्यामुळे ‘बोलू दिले जात नाही’ असा आरोप करण्यापूर्वी सभागृहातील प्रत्यक्ष आकडेवारी पाहावी, असा टोला बिडकर यांनी लगावला आहे.
‘निधीही जवळपास समान दिला’
राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये भाजपच्या नगरसेवकांना तुलनेने कमी निधी दिला जात होता, असा दाखला देत बिडकर यांनी सध्याच्या निधीवाटपाची तुलना केली आहे. २०२६-२७ मध्ये भाजपच्या नगरसेवकांप्रमाणेच अन्य पक्षांच्या सदस्यांनाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे निधी मिळत नसल्याची राष्ट्रवादीची तक्रार राजकीय हेतूने केली जात असल्याचा भाजपचा आरोप आहे.
बालवडकर यांनी ‘हर घर तिरंगा’ रॅलीवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर जाहीर टीका केल्याचा आक्षेप बिडकर यांनी घेतला आहे. या टीकेचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याशिवाय, ७ ऑगस्ट रोजी बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार निधीतून झालेल्या कामांच्या चौकशीचा ठराव मांडला, त्यातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करण्यात आल्याचे बिडकर यांनी म्हटले आहे.
१८ ऑगस्टच्या सभेतील भूमिकेवरही आक्षेप
१८ ऑगस्टच्या मुख्य सभेतील कामकाजाचा दाखलाही बिडकर यांनी दिला आहे. नियमांनुसार विषय दाखल करण्याच्या प्रक्रियेला इतर विरोधी पक्षांनी सहमती दर्शवली असताना बालवडकर यांनी विरोधाची भूमिका घेत कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बालवडकर यांची भूमिका ‘अहंकारी, असंसदीय आणि हेकेखोर’ असल्याचा थेट ठपका बिडकर यांनी ठेवला आहे.
निधी शून्य; पण नागरिकांच्या कामांना झळ नाही
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर विनाकारण टीका करणाऱ्या नगरसेवकांना पक्ष म्हणून सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. बालवडकर आणि टिंगरे यांचा निधी शून्य करण्यात आला असला, तरी त्यांच्या प्रभागातील नागरिकांची विकासकामे रोखली जाणार नाहीत, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पाठविण्यात आली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा