मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या दरम्यान, मराठवाड्यात नेमकं किती मराठ्यांना मराठा-कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे? याची आकडेवारी आता समोर आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा दाखल्यांच्या वाटपासाठी नियुक्त समितीच्या १४ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण ३ लाख १३ हजार १४४ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर ५२४ अर्ज नामंजूर करण्यात आले असून १०६ अर्ज प्रलंबित आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. यात सप्टेंबर २०२५ पासून आतापर्यंत बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ४५ हजार ५१३ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. तर एकही अर्ज शिल्लक नसल्याचे सूत्रांनी नमूद केले.
मराठा कुणबी आरक्षणप्रश्नी नेमण्यात आलेल्या न्या. संदीप शिंदे यांच्या समितीसाठी विभागात किती दाखले वाटप झाले, याबाबत साप्ताहिक प्रगती अहवाल सादर केला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी दाखल्यासाठी आतापर्यंत ३ लाख १३ हजार ७७४ अर्ज दाखल झाले. त्यापैकी एकूण ३ लाख १३ हजार १४४ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर ५२४ अर्ज नामंजूर करण्यात आले असून १०६ अर्ज प्रलंबित आहेत. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २५ हजार ७३१ अर्जांपैकी २५ हजार ६४९ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून ९ अर्ज प्रलंबित आहेत. तर प्राप्त अर्जांपैकी ७३ नाकारण्यात आले.
कोणत्या जिल्ह्यात किती दाखले विचरित?
जालना जिल्ह्यात १८ हजार ४४९ प्राप्त अर्ज असून त्यापैकी १८ हजार ३७५ दाखले वितरित झाले. तर केवळ १२ अर्ज शिल्लक आहेत.
परभणी जिल्ह्यात १९ हजार ८०६ प्राप्त अर्जांची संख्या आहे. तर १९ हजार ७२० दाखल्याचे वाटप झाले असून ५७ अर्ज प्रलंबित आहेत.
हिंगोली जिल्ह्यात १३ हजार ५१७ दाखल्याचे वाटप झाले तर ११ अर्ज प्रलंबित आहेत.
नांदेड जिल्ह्यात ४ हजार ८७२ अर्ज प्राप्त असून त्यात ४ हजार ८४२ प्रमाणपत्राचे वाटप झाले. तर १४ अर्ज शिल्लक आहेत.
बीड जिल्ह्यात प्राप्त अर्जांची संख्या २ लाख ८ हजार ६४६ असून यापैकी २ लाख ८ हजार ६३६ प्रमाणपत्रांचे वाटप झाले तर विद्यमान एकही अर्ज शिल्लक नाही. तर १० अर्जांवरील कार्यवाही प्रलंबित आहे.
लातूर जिल्ह्यात २ हजार ८४३ प्राप्त अर्जांची संख्या असून २ हजार ७९६ दाखले वितरित झाले व केवळ २ अर्ज शिल्लक आहेत.
धाराशिव जिल्ह्यात १९ हजार ६०९ दाखल्याचे वाटप झाले असून २८३ अर्ज नाकारण्यात आले तर केवळ १ अर्ज शिल्लक असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
सप्टेंबर २०२५ पासून आतापर्यंत ७४ हजारांहून अधिक अर्जांचे वाटप
सप्टेंबर २०२५ पासून ते आतापर्यंत ७४ हजार १२३ प्रमाणपत्रांचे वाटप विभागात झाल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी नमूद केले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ हजार ९९५, जालना ४ हजार, परभणी ६ हजार ९९५, हिंगोली ४ हजार ८३८, नांदेड ५४७, बीड ४५ हजार ५१३, लातूर ५८७ आणि धाराशिव जिल्ह्यात ५ हजार ६४८ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, असे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी नमूद केले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा