Headlines

मुर्शिदाबादमधील १७ वर्षीय मुलाच्या मदतीला धावून आले अनंत अंबानी; सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचारांची व्यवस्था – anant ambani helps 17 year old iqbal from murshidabad sp airlifted to mumbai for treatment



पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील १७ वर्षीय मुलाला गंभीर आजारामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्रास कमी व्हावा म्हणून तो बराच वेळ घरा परिसरातील तलावात राहायचा. आर्थिक अडचणींमुळे त्याच्या कुटुंबाला त्याच्यावर विशेष उपचार करणे शक्य होत नव्हते. ही गोष्ट अनंत अंबानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संवेदनशीलता दाखवत तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या पुढाकाराने वैद्यकीय तज्ज्ञांची टीम मुर्शिदाबाद येथे पाठवण्यात आली आणि मुलाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला विशेष उपचारांसाठी एअरलिफ्ट करून मुंबईत आणण्यात आले असून, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या या मदतीमुळे मुलाच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.

इक्बालच्या या असामान्य परिस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इक्बाल बराच वेळ पाण्यात असल्याचे दिसत होते. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या त्रासातून काहीसा दिलासा मिळत असल्याने इक्बाल दिवस-रात्र बराच काळ तलावातच राहायचा.

मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्यावर विशेष उपचार करणे त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेक दिवस इक्बालला अशाच परिस्थितीत राहावे लागले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे प्रकरण अखेर अनंत अंबानी यांच्या निदर्शनास आलं. इक्बालची परिस्थिती लक्षात घेत त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय तज्ज्ञांची एक टीम मुर्शिदाबाद येथे पाठवण्यात आली. या टीमने इक्बालच्या प्रकृतीची तपासणी करून पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमने इक्बालच्या घरी जाऊन त्याची प्राथमिक तपासणी केली. समोर आलेल्या इक्बालच्या आरोग्याची माहिती देणाऱ्या व्हिडिओनुसार, या तपासणीत रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. आशुतोष दास यांचाही सहभाग होता.

तपासणीनंतर डॉक्टरांनी इक्बालला पुढील तपासण्या आणि तज्ज्ञांकडून विशेष उपचार मिळावेत यासाठी मुंबईला आणण्याचा सल्ला दिला. अनंत अंबानी यांच्या पुढाकारामुळे आणि वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे इक्बालला आता आवश्यक उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इक्बालची प्रकृती आणि त्याच्या घरापासूनचे अंतर लक्षात घेऊन, त्याला वैद्यकीय देखरेखीखाली मुंबईला आणण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रथम रुग्णवाहिकेतून त्याला घरातून कोलकाता विमानतळावर नेण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष वैद्यकीय विमानाने त्याला मुंबईत आणण्यात आले.पुढील तपासणी आणि उपचारांसाठी त्याला मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

इक्बालच्या कुटुंबासाठी हे एक मोठे पाऊल आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक वर्षे त्याला योग्य उपचार मिळू शकले नव्हते. आता त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणार असल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. इक्बाल लवकर बरा होऊन चांगल्या प्रकृतीत घरी परतावा, हीच त्याच्या कुटुंबाची इच्छा आहे. अनंत अंबानी यांच्या मदतीमुळे त्यांच्या या आशेला आता नवी दिशा मिळाली आहे.

मुंबईतील डॉक्टर आता इक्बालची सविस्तर तपासणी करून आवश्यक वैद्यकीय चाचण्या करणार आहेत. या तपासण्यांनंतर त्याच्या प्रकृतीनुसार पुढील उपचार ठरवले जातील.

इक्बाल बराच वेळ पाण्यात राहत असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची परिस्थिती सर्वांच्या लक्षात आली. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आजाराचा त्रास कमी व्हावा म्हणून तो दिवस-रात्र बराच वेळ तलावात राहायचा. पाण्यात राहिल्याने त्याला काहीसा आराम मिळत होता. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने इक्बालवर विशेष उपचार करणे त्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्याला योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या.

मुर्शिदाबादमधील तलावाच्या पाण्यात राहून आजाराच्या त्रासातून आराम मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इक्बालला आता अनंत अंबानी यांच्या मदतीमुळे विशेष उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांसाठी संघर्ष करणाऱ्या त्याच्या कुटुंबाला या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या मुंबईतील रुग्णालयात इक्बालवर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारून तो लवकरच घरी परतावा, अशी कुटुंबाला आशा आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत