Headlines

‘अरे ऋषभ, कॉमन सेन्स आहे का तुला’; भारत-श्रीलंका कसोटीमध्ये मोहम्मद कैफ पंतवर इतका का भडकला?


Mohammad Kaif on Rishabh Pant : भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यानध्ये भारताने चांगली पकड मिळवली आहे. पहिल्या डावात भारताने ४६२ धावा केल्या आहेत. मात्र भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफवर चांगलाच भडकल्याचं दिसून आलं? नेमकं काय कारण जाणून घ्या.

Mohammad Kaif Rishabh Pant
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पहिल्या दिवशी यशापासून वंचित राहिलेल्या श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना माफक हादरे दिले. मात्र देवदत्त पडिक्कलचे दीडशतक, ध्रुव जुरेलचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ९ बाद ४६० अशी मजल मारली होती. पावसामुळे दुसऱ्या दिवशी केवळ ४३ षटकांचाच खेळ होऊ शकला. मात्र ऋषभ पंतच्या आऊट होण्यावर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने नाराजी व्यक्त केली. कैफने पंतवर टीका करताना त्याला कॉमन सेन्स नसल्याचं म्हटलं. पण त्याने असं काय केलं की कैफ त्याच्यावर इतका भडकला. जाणून घ्या.

मोहम्मद कैफ काय म्हणाला?

ऋषभ पंत याने ३९ धावा केल्या होत्या, यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला होता. पंत त्याच्या आक्रमकशैलीत खेळत असतो, त्यामुळे त्याची विकेट जाण्याची दाट शक्यता असते. रविवारीसुद्धा असेच काहीसे झाले. पंत अशाच पद्धताने गोलंदाजाला पुढे येऊन मारण्याच्या नादात आऊट झाला. मोहम्मद कैफ म्हणाला की, तो आऊट झाला याचं काही नाही पण तो ज्यावेळी आऊट झाला तो वेळ चुकीचा होता, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, विरोधी संघाने नवीन चेंडू घेतल्यावर त्याचा अंदाज घ्यायला हवा पण पंतने असे न करता नवीन चेंडूवर पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि दोन ते तीन चेंडूवर तो अपयशी ठरला पण तो पुन्हा पुढे आला आणि आपली विकेट गमावून बसला, असं मोहम्मद कैफ म्हणाला.

Maharashtra TimesKambli Web Series : सचिनचा जीवलग ते मैत्रीतील दुरावा; ‘कांबळी’चं वादळी आयुष्य आता OTTवर, भूमिकांबाबत उत्सुकता, कुठे पाहता येणार?
भारतास जागतिक कसोटी विजेतेपदाच्या स्पर्धेतील आपले आव्हान राखण्यासाठी या मालिकेत धवल यश आवश्यक आहे. पावसाचा वाढता व्यत्यय लक्षात घेऊन भारतीयांनी धावांचा वेग वाढवण्याकडे जास्त लक्ष दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ पाऊस, ओलसर मैदान तसेच अपुऱ्या प्रकाशामुळे दुपारी २.३५ वाजता सुरू झाला आणि त्याचा फायदा यजमानांना सुरुवातीस झाला. भारतीयांना दिवसभरात १७२ धावा करण्यासाठी सात विकेटचा मोबदला द्यावा लागला.

Maharashtra TimesKL Rahul : नर्व्हस नाईन्टीज नाही, राहुलचं ‘नर्व्हस एटीज’! 82वर पुन्हा शतक हुकलं, सातव्यांदा 80-90च्या आसपास अडकला
पहिल्या दिवसाच्या २ बाद २८८वरून सुरुवात करताना धावगती उंचावण्यास भारताची जास्त पसंती होती. ऋषभ पंतने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. मात्र खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पंतची फटकेबाजी फारवेळ सुरू राहिली नाही. दुसऱ्या नव्या चेंडूवर श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज जास्तच भेदक भासू लागले. अचुक टप्प्यावर मारा करणाऱ्या नूवांथाच्या फिरकीने पहिल्या दिवशी निवृत्त झालेल्या राहुललाही चकवले. नूवांथाने या दोन विकेट १२ धावांतच घेतल्या होत्या. देवदत्त पडिक्कल या पडझडीत शांत राहिला. त्याने क्रीझचा हुशारीने वापर करीत दीडशतक पूर्ण केले. त्याचे पूर्ण वर्चस्व दिसत असतानाच जयसूर्याने त्याला चकवले.

Maharashtra TimesWTC Point Table 2026 : बांगलादेशविरूद्ध ऑस्ट्रेलियाचा पराभव भारतासाठी फायद्याचा की तोट्याचा, पुढची समीकरणे समजून घ्याचहापानानंतर रवींद्र जाडेजाही पायचीत झाला आणि भारताची अवस्था ६ बाद ३७७ अशी झाली. भारतास चारशेच्या आत रोखण्याचे स्वप्न श्रीलंका बघू लागली. मात्र चिवट ध्रुव जुरेल आणि मानव सुतारने अर्धशतकी भागीदारी केली. जुरेलला २९ धावांवर असताना जीवदान लाभले होते. जुरेलने पूर्ण वर्चस्व राखले नाही. मात्र आक्रमणाची एकही संधी सोडली नाही. अर्धशतक झाल्यावर जुरेल चांगल्याच वळलेल्या चेंडूवर परतला. भारतीय फलंदाज त्यानंतर जास्त आक्रमक झाले. मोहम्मद सिराज आणि मानव सुतारने काही चेंडूंच्या अंतराने षटकार मारला.

Maharashtra TimesRohit Sharma Fan : सायकलवरुन १८०० किमी प्रवास; निर्जन जंगलं पार केली, मदतीचे पैसे नाकारले; रोहितच्या फॅननं मुंबई गाठलीच, पुढं काय घडलं?श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज प्रभावी मारा करीत असताना त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी निराशा केली. तेच भारताच्या पथ्यावर पडले. दुसऱ्या दिवसअखेर मानव सुतारने संघाची तळाच्या फलंदाजाने उपयुक्त खेळी करण्याची गरज पूर्ण केली होती. आज, सोमवारी तिसऱ्या दिवशी सुतार, जाडेजा आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजांना मदत करू लागलेल्या खेळपट्टीवर काय करामत करणार याकडे लक्ष असेल.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा