Nagpur News: नागपूरमध्ये असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालीसाठी अमुल्य योगदान दिले.या विद्यालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याने हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलवण्यात आले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी,नागपूर :‘नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक वाटचालीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ( मेयो ) अमूल्य योगदान आहे. या हीरक महोत्सवी वर्षात एआय आधारित अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही,’ असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिले.
हीरक महोत्सव सोहळा
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ६० वर्षे पूर्ण झाल्याने रुग्णालयाच्या सभागृहात हीरक महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बावनकुळे बोलत होते. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. भावना सोनवणे, डॉ. राजीव खंडेलवाल, माजी आमदार डॉ. मिलिंद माने आदी उपस्थित होते.
आराखडा तयार करणार
बावनकुळे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसह शहरी भागातील अनेक कुटुंबांच्या आरोग्यासाठीमेयोने मोठे योगदान दिले आहे. हीरक महोत्सवी वर्षाचा हा मोठा पल्ला आरोग्याच्या दृष्टीने मेयोने बजावलेल्या कर्तव्यपूर्तीचा आहे. या वाटचालीला अधोरेखित करताना हाती घेण्यात आलेल्या अनेक लोकाभिमुख उपक्रमांना आणि रुग्णांच्या सुविधेकरिता आवश्यक बाबींना गती देण्यासाठी लवकरच महाविद्यालयाच्या समिती सदस्यांसह चर्चा करून व्यापक आराखडा तयार करू.’
यावेळी हीरक महोत्सवाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल मॅमोग्राफी, पेन क्लिनिक, सेंट्रल क्लिनिकल लॅबोरेटरीचा रिपोर्ट रुग्णांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देणाऱ्या ॲपचे लोकार्पण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन डॉ. गोपाल अग्रवाल यांनी केले.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा