![]()
मराठा नेते मनोज जरांगे पाटील राज्य सरकारविरेधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी देखील सरकारला मोठा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाजाची फसवणूक केली असल्याचा गंभीर आरोप केला जातोय. शिंदेंनी मराठा समाजाला फसवल्यास त्यांना महागात पडेल, असा इशारा देण्यात येतोय. कुणबी दाखले अवैध ठरवले जात असल्याचा दावा करत मराठा बांधव संतप्त झाले आहेत. राज्यातील तमाम मराठा बांधव अंतरवलीत दाखल होणार अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Source link
मराठा समाजाची फसवणूक, जरांगे समर्थक आक्रमक; शिंदे-फडणवीसांना आव्हान
