Headlines

यूपीच्या बिजनौरमध्ये हायवेवर वाहत आहे गंगा नदी:हिमाचल-उत्तराखंडमध्ये 300 रस्ते बंद; झारखंडमध्ये पाऊस, वीज कोसळून 14 ठार




देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेला सततचा पाऊस आता जीवघेणा ठरत आहे. झारखंडमध्ये मंगळवारी वीज पडून १४ जणांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले. यामध्ये सर्वाधिक मृत्यू गिरिडीह (नऊ) येथे झाले, त्यानंतर दुमका (तीन) आणि लातेहार (दोन) यांचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. यात एका खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला, तर एका २५ वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. दुसरीकडे, केरळमध्ये १ ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे २५ जणांचा बळी गेला असून चार जण बेपत्ता आहेत. सततचा पाऊस आणि पुरामुळे हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. केरळ सरकारच्या माहितीनुसार, १८,००० हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे; पथानामथिट्टा, कोट्टायम आणि अलाप्पुझा हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे ३०० हून अधिक रस्ते बंद झालेत. यात हिमाचलमधील १६० आणि उत्तराखंडमधील १०० हून अधिक रस्त्यांचा समावेश आहे. उत्तराखंडमधील डेहराडून आणि बागेश्वर जिल्ह्यांमधील १२ वीपर्यंतच्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. उपग्रह नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पहा देशभरातून हवामानाचे फोटो

हवामानाशी संबंधित अपडेट्ससाठी, खालील लाइव्ह ब्लॉग पहा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत