RBI (Reserve Bank Of India) युपीआय ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेत सुरक्षितता वाढवण्यासाठी लवकरच नव्या नियमांची अमलबजावणी करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सहसा UPI पेमेंट करताना आधी किंमत टाकावी लागते किंवा QR Code स्कॅन करावा लागतो मग आपला PIN टाकून एकाच क्लिकवर पेमेंट होऊन जाते. पण UPI च्या नव्या नियमांनुसार, पेमेंट करण्यापूर्वी वापरकर्त्याला Yes/No स्वरूपात काही प्रश्न विचारले जातील. त्याचे योग्य उत्तर दिल्यावरच पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे आतापर्यंत सोप्पी आणि जलद असणाऱ्या UPI पेमेंट प्रक्रियेत थोडा विलंब वाढण्याची शक्यता आहे.
UPI च्या नव्या नियमामुळे पेमेंट प्रक्रियेत उशीर लागू शकतो. प्रक्रिया नवीन असल्यामुळे सुरुवातीला पेमेंट करण्यामध्ये अनेकांना अडचणी येऊ शकतात तसेच गोंधळ निर्माण होऊ शकतो. प्रत्येक पेमेंट प्रक्रियेत एक अतिरिक्त क्लिक वाढल्यामुळे काहींना चिडचिडीही होऊ शकते. पण UPI च्या या नव्या नियमामागे अनेक फायदे आहेत. UPI ने त्यांच्या पेमेंट प्रक्रियेत बदल करण्याचा हेतू म्हणजे ग्राहकांची सुरक्षितता वाढवणे.
Yes/No स्वरूपातील प्रश्ने म्हणजे नेमकं काय?
UPI प्रत्येक पेमेंट अगोदर कन्फर्मेशन म्हणून काही प्रश्न पेमेंट कर्त्याला विचारेल. प्रश्न विचारण्यामागचा हेतू म्हणजे ग्राहकाची आर्थिक सुरक्षितता वाढवणे. हो किंवा नाही या एकाच शब्दात उत्तर असेल असे प्रश्न प्रत्येक पेमेंट अगोदर विचारण्यात येतील. योग्य उत्तर दिलात तरच तुमचा पेमेंट यशस्वी होईल अन्यथा पुन्हा प्रयत्न करावे लागेल.
Indian Taxpayer Viral Post : 26,600 रुपयांच्या डिव्हिडंटवर 26,300 रुपये टॅक्स-व्याज, महिला म्हणते- ‘आता 300 रुपयांचं काय करू?’UPI च्या नव्या बदलाचा फायदा काय असेल?
UPI च्या या बदलामुळे UPI पेमेंट प्रक्रियेत आणखीन सुरक्षितता वाढू शकते. कधीकाळी घाईत असताना एका किमतीवर एखादा शून्य जास्त लागला तर ते फार नुकसानदायकही ठरू शकतं. पण UPI च्या या नव्या नियमामुळे अशा चुका होण्याची शक्यता फार कमी असेल. तसेच ऑनलाईन फसवणुकीपासूनच्या सुरक्षिततेतही वाढ होईल. ऑनलाईन फ्रॉडसारखा प्रकार टाळता येईल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर एखादा पेमेंट चुकून झालाच तर तो टाळण्यासाठी आपल्याकडे एका तासाचा वेळ दिला जातो. तसेच मोठ्या किंमतीच्या व्यवहार करताना डबल चेक करण्याची संधी मिळते, ज्यामुळे चुका टाळता येऊ शकतात.

