Chetana Bhat Husband : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटच्या नवऱ्याची फसवणूक झाली असून त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत त्यानं सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मालिका किंवा सिनेमांमध्ये काम करूनही मानधन न मिळाल्याचा अनुभव काही कलाकारांना आला आहे. याबद्दल काही कलाकारांनी उघडपणे भाष्य केलं आहे. अशातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटचा नवरा आणि गीतकार मंदार चोळकरची फसवणूक झाली असून त्यानं याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
‘तर विषय असा आहे, एका खिशात स्वतःचे पैसे नसणाऱ्या निर्मात्याकडून आलेल्या एका सिंगल गाण्यासाठी मी शब्द दिले आणि माझ्या शब्दाखातर माझ्या ओळखीतल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्तम गायकाने ते मानधन नं विचारता गायलं ही. त्या गायकाचे, माझे आणि माझ्या संगीतकारचे 4 महिने झाले पैसे अडकले आहेत. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या क्षेत्रात पैसे बुडावणं हे रुटीन झालंय, पण माझा त्रास वेगळंच आहे. त्या निर्मात्याने आमचे पैसे बुडवले आहेतच. पण आता त्या गायकाला मला दुसऱ्या गाण्यासाठी भेटायचं आहे. ते कुठल्या तोंडाने भेटू? तो किंवा त्याचा मॅनेजर आधीच्या गाण्याचे पैसे मागणार ही नाहीत कदाचित… पण माझे संस्कार माझ्या आड येत आहेत. कारण पहिले पैसे क्लिअर व्हायलाच हवेत.’ असं मंदारनं शेवटी म्हटलं आहे.
दरम्यान, मंदारच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं ‘दुनियादारी’ सिनेमातील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, तसेच ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमातील ‘मनमंदिरा’ हे नाट्यगीत यांसारख्या अनेक गाजलेल्या गाण्याचं लेखन त्यानं केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा