Headlines

Vijay Mallya 9000 Crore Bank Fraud Story; कधीकाळी भारताची होती शान, आज अस्तित्वच संपुष्टात; चुकीच्या निर्णयामुळे किंगफिशर एम्पायर हवेतून जमिनीवर


Biggest Airlines Downfall: फरार उद्योगपती विजय मल्ल्याने 2005 मध्ये किंगफिशर एअरलाइन्स सुरू केलेली जी एकेकाळी भारतातील सर्वात स्वस्त विमान कंपन्यांपैकी होती. मात्र विजय मल्ल्या यांच्या उधळपट्टी, गैरव्यवस्थापन आणि वाढत्या कर्जामुळे 2012 मध्ये कोसळली.

Vijay Mallya Kingfisher Airlines Downfall Story
Kingfisher Downfall: किंगफिशर एअरलाईन्सच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तीन वर्ल्ड कॅप झाले. 2003 मध्ये जेव्हा विजय मल्ल्यांने या एअरलाईन्स कंपनीचा पाय घातला सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरी गाठली. त्यानंतर, 2007 मध्ये भारत पहिल्याच फेरीत गारद झाला आणि आणि त्याच वर्षी किंगफिशरचे ‘बुरे दिन’ सुरू झाले. मग, 2011 मध्ये एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला आणि त्यावेळी किंगफिशर देशातील दुसरी सर्वात मोठी एअरलाइन बनली. पण इतकी मोठी एअरलाईन्स कंपनी अखेरीस दिवाळखोर झाली कशी?

A law firm wants to leave Vijay Mallya’s two-decade-old case. They have not communicated with their client for many years.

A law firm wants to leave Vijay Mallya's two-decade-old case.  They have not communicated with their client for many years.

किंगफिशर एअरलाइन्स विजय मल्ल्या यांच्या मालकीची आणि त्यांच्या कोट्यवधी साम्राज्याचा गौराज मानली जायची. पण एकेकाळी भारतातील सर्वात स्वस्त विमान कंपनी मानल्या जाणाऱ्या किंगफिशर एअरलाइन्सचा मल्ल्या यांच्या उधळपट्टी आणि गैरव्यवस्थापनामुळे अवघ्या 7 वर्षांतच शेवट झाला. 2005 मध्ये विजय मल्ल्याने सुरू केलेल्या या विमान कंपनीचा उद्देश प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सेवा प्रदान करून देण्याचा होता, पण आश्वासक सुरुवात होऊनही किंगफिशर एअरलाइन्सला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यामुळे 2012 मध्ये किंगफिशर ग्राऊंडेड झाले.

विजय मल्ल्या बनले ‘किंग ऑफ बॅड टाइम्स’

<strong>विजय मल्ल्या बनले ‘किंग ऑफ बॅड टाइम्स’</strong>

भारतीय बँकांकडून कर्ज घेऊन भारतातून पसार झालेले मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकले आहेत. मल्ल्या यांच्यावर बँकेचे अंदाजे 9000 कोटींचे कर्ज असून त्यांनी सरकार आणि बँकांकडून यापेक्षा जास्त किंमत वसूल केल्याचा अनेकदा दावा केला. एकेकाळी भारतातील सर्वात प्रसिद्ध व्यावसायिकांपैकी विजय मल्ल्या यांच्या साम्राज्याचा शेवट एखाद्या चित्रपटासारखा आहे. मल्ल्या यांचा सिनेसृष्टीपासून ते कॉर्पोरेट लॉबी आणि अगदी क्रीडा जगतावरही प्रभाव होता. मग ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ म्हणून प्रख्यात विजय मल्ल्या यांना कोणती चूक नडली?

2007 मधील एक चूक नडली

<strong>2007 मधील एक चूक नडली</strong>

विजय मल्ल्याने 2005 मध्ये किंगफिशर एअरलाईन्स सुरू केलेली आणि या कंपनीला देशातील मोठा ब्रँड बनवण्याचा त्यांचा उद्देश होता. म्हणूनच मल्ल्याने 2007 मध्ये देशातील पहिली कमी खर्चाची एअरलाइनचा, एअर डेक्कन, तब्बल 300 दशलक्ष डॉलर्स (2007 मध्ये अंदाजे 1200 कोटी रुपये) खर्च करून ताबा घेतला, जी मल्ल्याची सर्वात मोठी चूक ठरली. या करारानंतर 5 वर्षांतच मल्ल्यांची किंगफिशर एअरलाइन्स कोसळली आणि त्यांचे संपूर्ण व्यावसायिक साम्राज्य अक्षरशः नष्ट झाले.

किंगफिशर बनली दुसरी मोठी एअरलाईन

<strong>किंगफिशर बनली दुसरी मोठी एअरलाईन</strong>

या खरेदी करारामुळे मल्ल्याला तात्काळ फायदा झाला आणि 2011 मध्ये किंगफिशर देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी बनली. पण, एअर डेक्कनचे अधिग्रहण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात कंपनी अयशस्वी ठरली आणि वाढत्या इंधन खर्चामुळे परिचालन खर्च वाढला, ज्यामुळे मोठे नुकसान झाले.

विजय मल्ल्याच्या घाईमुळे डाव फसला?

<strong>विजय मल्ल्याच्या घाईमुळे डाव फसला?</strong>

विजय मल्ल्याला किंगफिशरद्वारे शक्य तितक्या लवकर उंचच उंच यशाचे शिखर चढायचे होते. पण राष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही विमान कंपनीला 5 वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापासून मनाई आहे. यादरम्यान, मल्ल्याने एअर डेक्कनचे अधिग्रहण करून हा नियम टाळण्याचा प्रयत्न केला, जी त्यांची मोठी धोरणात्मक चूक ठरली परिणामी किंगफिशर मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकली.

किंगफिशरला लागलं टाळ

<strong>किंगफिशरला लागलं टाळ</strong>

त्यानंतर मल्ल्याने आणखी एक चुकीचा निर्णय घेतला. मल्ल्या एअर डेक्कनला दत्तक मुलाप्रमाणे वागवत होते आणि मर्जरनंतर एअर डेक्कनचे ग्राहक किंगफिशरकडे वळतील अशी मल्ल्यांना आशा होती, पण नेमकं त्याउलट घडलं. अखेरीस एअर डेक्कनचे – किंगफिशर रेडचे _ ग्राहक इतर कमी खर्चिक विमान कंपन्यांकडे वळू लागले. त्यामुळे ऑक्टोबर 2012 मध्ये किंगफिशर एअरलाइन्सला टाळं लागलं, ज्याचा परिणाम मल्ल्यांच्या व्यावसायिक साम्राज्यावर झाला.

मल्ल्याची परिस्थिती इतकी बिकट का झाली?

<strong>मल्ल्याची परिस्थिती इतकी बिकट का झाली?</strong>

विजय मल्ल्याला वडील विठ्ठल मल्ल्या यांच्याकडून मद्य व्यवसायाचा वारसा मिळालेला आणि देशातील नामांकित व्यवस्थापन संस्थांमधून लोकांना भरती केले आणि मद्य उद्योगाला कॉर्पोरेट स्वरूप दिले. मात्र, क्षणात नवीन कंपन्या विकत घेण्याच्या आणि अनेकदा हिशोब न पाहता निर्णय घेण्याच्या सवयीमुळेच मल्ल्याचा ‘रावाचा रंक’ झाला. मल्ल्याने दारूचा बादशाह म्हणून नव्हे तर ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ उद्योजक म्हणून ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने किंगफिशर एअरलाइन्सची सुरुवात केलेली. म्हणूनच त्यांना आपल्या एअरलाइनमधील प्रवाशांना अशा सर्व सोयीसुविधा द्यायच्या होत्या, ज्याचा विचार इतर कोणत्याही कंपनीने केला नव्हता.

नफ्यावर नकारात्मक परिणाम

<strong>नफ्यावर नकारात्मक परिणाम</strong>

मल्ल्याने आपल्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महागडी परदेशी वृत्तपत्रे आणि मासिके मागवली, जी बहुधा गोदामातून बाहेरच पडली नाही. याचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या नफ्यावर होणे साहजिक होते, पण यामुळे वारंवार कर्ज घेणारा मल्ल्या इतका कर्जबाजारी झाला की, कर्जाची परतफेडही करू शकला नाही आणि देशातून पळ काढला.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा