► वृत्तसंस्था अयोध्या
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट 22 जुलैनंतर राम मंदिराच्या व्यवस्थेत व्यापक बदल लागू करण्याची तयारी करत आहे. दर्शन व्यवस्था, राग-भोग, पूजा पद्धती, भक्तांसाठीच्या सुविधा आणि प्रशासकीय प्रणाली अधिक पद्धतशीर व पारदर्शक करण्यासाठी ट्रस्ट विचारमंथन करत आहे. रामानंदी परंपरेतील अयोध्येतील संत आणि विद्वानांच्या सूचनांचाही यात समावेश केला जात आहे.
सूत्रांनुसार, 22 जुलै रोजी होणाऱ्या ट्रस्टच्या बैठकीनंतर नवीन व्यवस्था अंतिम केली जाऊ शकते. या बैठकीत नवीन सरचिटणीस आणि रिक्त पदांसाठी नवीन सदस्यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मंदिराचे कामकाज अधिक मजबूत करण्याच्या बाजूने ट्रस्ट आहे.
संतांच्या सूचनांवर गांभीर्याने विचार केला जात असल्याचे ट्रस्टचे खजिनदार गोविंद देवगिरी यांनी असेही सूचित केले आहे. की, संतांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे व्यवस्थेत आणखी सुधारणा केली जाईल, जेणेकरून राम मंदिर देशभरातील भक्तांसाठी एक आदर्श, शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रणालीचे उदाहरण बनू शकेल, असे सांगण्यात आले.
सेवा प्रणालीमध्येही सुधारणा
रामानंदीय परंपरेनुसार पूजा पद्धती सुव्यवस्थित करणे, राग-भोग पद्धतीत सुधारणा करणे आणि भक्तांची सोय सुनिश्चित करणे यासह अनेक मुद्यांवर विचार केला जात आहे. दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करणे, व्यवस्थापन अधिक पारदर्शक करणे आणि मंदिराची प्रशासकीय प्रणाली आधुनिक व उत्तरदायी बनवणे हे ट्रस्टचे उद्दिष्ट आहे. सुरक्षा, गर्दी व्यवस्थापन आणि सेवा प्रणालीमध्येही आवश्यक सुधारणा केल्या जातील.
महंत दिनेंद्र दास यांचे मार्गदर्शन
राम मंदिराची पूजा पद्धत रामानंद परंपरेनुसार आयोजित करण्याचे प्रयत्नही तीव्र झाले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक दिनेश चंद्र यांनी निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि राम मंदिराचे विश्वस्त यांची भेट घेत पूजा पद्धतीबाबत सविस्तर सूचना घेतल्या. राम मंदिरानेही शास्त्राrय विधी आणि परंपरांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे, असे महंत दिनेंद्र दास यांनी रामानंदी परंपरेनुसार निर्मोही आखाड्यात केल्या जाणाऱ्या पूजा विधींचे वर्णन करताना सांगितले. अलीकडेच, त्यांनी पूजा विधींबाबत काही सूचना केल्या केल्या होत्या.
