Headlines

कोयना धरणाच्या जलाशयाचे नामांतर:आता "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार, राज्य सरकारचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोयना जलसागराला आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने कोयना जलसागराच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कोयना जलसागराचे नामांतर करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार…

Read More

दर्यापूरच्या प्राध्यापकाने गोवऱ्या बनवण्याचे यंत्र बनवले:या अभिनव संशोधनाला भारत सरकारकडून मिळाले पेटंट

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी गोवऱ्या बनवण्याचे अभिनव यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील एका महत्त्वाच्या कामाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या संशोधनाचे नाव “गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनास्तव आयओटी बेस मशीन निर्मिती” असे आहे….

Read More

525 NHM कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी:यादी जाहीर; हरकती नोंदवण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत, 7 ऑगस्ट रोजी अंतिम यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ५२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या या कर्मचाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील संभाव्य तांत्रिक चुकांवर हरकती नोंदवण्यासाठी संबंधित उमेदवारांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी…

Read More

राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा:हजारो भाविकांची उपस्थिती, स्मृतींना उजाळा

मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंतांची महासमाधी रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरुमाऊलीला आदरांजली वाहताना विविध भजने गायली. शंखनाद आणि…

Read More

अमरावती सुपर स्पेशालिटीत दुर्मिळ अन्ननलिका कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया:डॉ. अतुल यादगिरे यांच्या नेतृत्वाखाली 40 वर्षीय महिलेवर उपचार

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे अन्ननलिकेच्या दुर्मिळ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ४० वर्षीय महिलेवर यशस्वी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या महिलेला कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल यादगिरे आणि त्यांच्या चमूने जीवनदान दिले. रुग्णाला अन्न गिळताना आणि पाणी पितानाही तीव्र त्रास होत होता. अन्ननलिकेत अडथळा निर्माण झाल्याने तिच्या…

Read More

रोजगार निर्माण करणारे उद्योजक बना:डॉ. चंद्रकांत शिंदे यांचे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित करिअर संसद शपथविधी सोहळ्यात श्री संकल्प मीडिया सोल्युशनचे संचालक डॉ. चंद्रकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचे आवाहन केले. त्यांनी पदवी घेऊन न थांबता स्वतःच्या कल्पना, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर उद्योजक बनण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. महाविद्यालयाच्या सर सी.व्ही. रमण सभागृहात ‘करिअर संसद शपथविधी आणि यशस्वी उद्योजकांशी…

Read More

लहान व्यावसायिकांवर कारवाई, पण हेल्मेट विक्रेत्यांवर का नाही?:भीम ब्रिगेडचा महानगरपालिकेला सवाल, आयुक्तांना निवेदन

अमरावती शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यावरून भीम ब्रिगेडने महापालिका प्रशासनावर दुटप्पी धोरणाचा आरोप केला आहे. चहा, पानटपरी आणि नाश्त्याची गाडी लावणाऱ्या लहान व्यावसायिकांवर कारवाई केली जाते, मात्र रस्त्यांच्या कडेला दुकाने थाटणाऱ्या हेल्मेट विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. या संदर्भात भीम ब्रिगेडने बुधवारी (२९ जुलै) मनपाचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांना…

Read More

High Court Questioned Tukaram Mundhe FDA How Many Raid on Government Offices Canteen

नवी मुंबईतील एका पंचरांकीत हॉटेलवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात संबंधित हॉटेल प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने केवळ खासगी अस्थापनांवर नाही तर शासकीय कार्यालयांच्या स्वयंपाकघरातही पाहणी करण्याचे आदेश दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यभरातील किती सरकारी, निमसरकारी संस्था, कार्यालये आणि न्यायिक आणि वैधानिक संस्थांमधील उपाहारगृहांची नियमांच्या पालनाविषयी…

Read More

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीत कर्ज आणि यादीचा घोळ, ‘हेअरकट’ प्रकरण काय? – portal amount vs bank dues mismatch sparks confusion

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jul 2026, 9:43 pm #MaharashtraFarmerLoanWaiver #ShetkariKarjamafi #LoanWaiverAmountMismatch #ShetkariKarjmuktiYojana #KarjmuktiYojanaListराज्यातील महायुती सरकार आणि राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’नुसार शासन कर्जमुक्तीसाठी ज्या याद्या जाहीर करत आहे त्यात पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी कर्जमाफीच्या रकमेबाबत गोंधळ निर्माण झालाय… वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी कर्जमुक्तीसाठीच्या याद्या प्रसिद्ध होत असताना शासनाच्या पोर्टलवर दाखवलेली…

Read More

मुंबईहून आलेल्या विवाहित जोडप्याचे प्रयागराजमध्ये अपहरण:मध्यरात्री ऑटो थांबवून कारमध्ये ओढले, गैरवर्तन केल्यानंतर 2 आयफोन लुटले

प्रयागराजमधील करेली येथे मुंबईहून आलेल्या एका विवाहित जोडप्याचे मध्यरात्री रस्त्यातून अपहरण करण्यात आले. दोघे ऑटोने जात होते. याच दरम्यान, कारमधील तीन तरुणांनी त्यांना थांबवून कारमध्ये ओढले. रस्त्यात मुलीशी गैरवर्तन केले. दोन आयफोनही लुटले. विवाहित जोडप्याने आरडाओरडा केल्यावर रस्त्यावरील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुमारे ३.५ किमी पाठलाग केल्यानंतर गुन्हेगारांना पकडले. त्यांच्या तावडीतून जोडप्याला सोडवले. ही…

Read More