Headlines

178 धावांची आघाडी, श्रीलंका दबावात! पण टीम इंडियाच्या विजयात पाऊस व्हिलन ठरला तर गिल-गंभीर कोणता निर्णय घेणार?


India vs Sri Lanka : गॉल कसोटीत भारताने पहिल्या डावात १७८ धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली आहे. मात्र, चौथ्या दिवशी पावसाचा मोठा धोका वर्तवण्यात आल्यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या रणनीतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Ind vs SL 1st Test
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात ४६२ धावा उभारल्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर गुंडाळत १७८ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. सामना सध्या भारताच्या बाजूने झुकलेला दिसत असला तरी, चौथ्या दिवशी गॉलमधील खराब हवामान आणि पावसाचा अंदाज भारतीय संघाच्या गणितामध्ये अडथळा निर्माण करू शकतो.

भारतीय फिरकीपटूंची कमाल आणि श्रीलंकेचा प्रतिकार

तीसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः फिरकीपटूंनी अप्रतिम कामगिरी केली. युवा फिरकीपटू मानव सुथार याने सर्वाधिक ४ बळी टिपत आपली छाप पाडली, तर अनुभवी रवींद्र जडेजाने ३ गडी बाद केले. एका वेळी श्रीलंकेची अवस्था ५ बाद ९० अशी बिकट झाली होती. मात्र, सोनल दिनुषा आणि निरोशन डिकवेला यांनी सहाव्या विकेटसाठी १४६ धावांची शतकी भागीदारी रचत भारताचा विजयाचा मार्ग काहीसा कठीण केला. गॉलच्या मैदानावर २०१५ नंतर प्रथमच श्रीलंकेच्या ६ व्या विकेटसाठी १०० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. अखेर शेवटच्या सत्रात जडेजाने आणि सुथारने या दोघांना बाद करत श्रीलंकेचा डाव २८४ धावांवर रोखला.

Maharashtra TimesIND vs SL : गिलला चौथ्या दिवशी खास रणनीतीने मैदानात उतरावं लागेल; तरच मिळेल विजय! तिसऱ्या दिवशी भारत कुठे पास-कुठे फेल?

पाऊस ठरणार का सर्वात मोठा ‘व्हिलन’?

चौथ्या दिवशी भारतासमोर सर्वात मोठे आव्हान हे श्रीलंकेच्या गोलंदाजांचे नसून हवामानाचे असणार आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, चौथ्या दिवशी सकाळी ७:०० ते ११:०० वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. सकाळी १० वाजता सामना सुरू झाल्यावर पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, दुपारनंतर १:०० वाजल्यापासून हवामान स्वच्छ राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गॉलचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पाऊस पडल्यानंतर लगेचच कडक ऊन पडते, त्यामुळे मैदानाची परिस्थिती लवकर सुधारू शकते.

शुभमन गिल आणि गौतम गंभीर समोर मोठे धर्मसंकट

भारताकडे सध्या १७८ धावांची आघाडी आहे. जर चौथ्या दिवशी पावसामुळे पहिले सत्र वाया गेले, तर कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना मोठा निर्णय घ्यावा लागेल. श्रीलंकेला विजयासाठी ३५० ते ४०० धावांचे आव्हान देण्यासाठी भारताला दुसऱ्या डावात वेगाने किमान २०० धावा कराव्या लागतील. यासाठी भारताला किमान दोन सत्रे फलंदाजी करावी लागेल आणि श्रीलंकेला बाद करण्यासाठी चार सत्रे द्यावी लागतील. मात्र, वेळेची कमतरता असल्यास भारत लवकर डाव घोषित करण्याचा धोका पत्करणार का, हा मोठा प्रश्न आहे.

Maharashtra TimesRavindra Jadeja : 90 कसोटीत 4 हजार धावा अन् 350 विकेट्स! जडेजाने गाठला खास टप्पा, थेट कपिल देव क्लबमध्ये एन्ट्री

WTC फायनलसाठी विजय आवश्यक

आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टिकोनातून भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. बांगलादेशने नुकताच ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुळे WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. भारताची घसरण ५ व्या स्थानावर (४६.६७% अंक) झाली आहे. यापुढील काळात भारताला न्यूझीलंड दौरा आणि मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) खेळायची आहे. त्यामुळे गॉल कसोटी अनिर्णित (Draw) राहणे किंवा हरणे भारताला परवडणारे नाही. आता चौथ्या दिवशी निसर्ग भारताला साथ देतो का आणि कर्णधार गिल काय रणनीती आखतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा