Headlines

मुलीच्या बाळंतपणासाठी गेली होती आई, रात्री झोपेतच वाघाने नेले फरफटत अन्…| Maharashtra Times



Gondia Woman Killed in Tiger Attack: गोंदिया जिल्ह्यातील पलसागाव येथे पहाटे अंगणात झोपलेल्या ४९ वर्षीय प्रभाबाई शंकर कोरम या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. विदर्भात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने उपाययोजनांची मागणी केली.

शेतकऱ्यांनी घेरलं, पण थांबले नाहीत, सदाभाऊ खोतांच्या पूरग्रस्तांना भेटी सुरुच

म.टा. वृत्तसेवा, गोंदिया: राज्यात वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असताना, गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवरी तालुक्यातील धमडीटोला येथे खाटेवर झोपलेल्या महिलेवर वाघाने हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात ४९ वर्षीय महिलेला प्राण गमवावे लागले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मृत महिलेचे नाव प्रभाबाई शंकर कोरम असून त्या देवरी तालुक्यातील आलेवाडा येथील रहिवासी होत्या. महिनाभरापूर्वी त्या बाळंतपणाच्या मदतीसाठी धामडिटो येथील मुलीच्या घरी आल्या होत्या. शनिवारी जेवणानंतर सर्व कुटुंब झोपी गेले. रात्री १ वाजताच्या सुमारास प्रभाबाई या झोपलेल्या असतानाच वाघाने हल्ला करून त्यांना ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत नेले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी हाका मारल्या आणि ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. वनविभाग आणि पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोखून वनविभागाच्या कारवाईवर सवाल उपस्थित केले. या भागात वारंवार होत असलेल्या वन्यजीव हल्ल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पीडित कुटुंबाला पुरेशी भरपाई देण्याची मागणी केली. प्राथमिक स्वरूपात कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित भरपाई लवकरच दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांनी घेरलं, पण थांबले नाहीत, सदाभाऊ खोतांच्या पूरग्रस्तांना भेटी सुरुच

वाघांचे वाढते हल्ले

विदर्भात अलीकडच्या काळात वाघाचे हल्ले चिंताजनक प्रमाणात वाढले आहेत. नुकतेच २४ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) कार्यरत असलेल्या एका जिप्सी चालकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भद्रावती तालुक्यातील भामडेली गावातील अमोल बबन नन्नावरे (३८) हे आपल्या वडिलांना शेतात कीटकनाशक फवारणीसाठी पंप देण्यासाठी गेले असताना, सकाळी साडेअकराच्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. सुमारे ५० फूट दूरपर्यंत ओढत नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ही घटना त्यांच्या वडिलांसमोरच घडली. त्यांनी जोरजोरात आरडाओरड करत गावकऱ्यांना सतर्क केले, त्यामुळे वाघाने मृतदेह सोडून जंगलात पळ काढला.