Headlines

‘मी आज खेळतोय’; वैभवने डेब्यूबद्दल सर्वात पहिलं कोणाला सांगितलं, ना आई ना कोच रोमी, मग कोण?


Vaibhav Sooryavanshi Debut News : भारताचा स्टार खेळाडू बेबी बॉसने शनिवारी डेब्यू करत इतिहास रचलाच. आयपीएलनंतर पठ्ठ्याची निवड तिरंगा मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली. त्यापाठोपाठ थेट भारतीय संघात एन्ट्री झाली. शनिवारी तो दिवस उजाडला वैभव भारताकडून मैदानात उतरला, पठ्ठ्याने ही बातमी सर्वात आधी कोणाला सांगितली जाणून घ्या.

Vaibhav sooryavanshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : जेकब बेथेलच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडने मालिकेतील दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघावर चार विकेटनी मात केली. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले होते. या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने पदार्पण केले. वैभवने सर्वात बातमी पहिल्यांदा कोणाला दिली? जाणून घ्या. बीसीसीआयने व्हिडीओ शेअर केला आहे.

मला माझ्या डेब्यूबद्दल कळलं, तेव्हा मी सर्वात आधी माझ्या रूममध्ये जाऊन ही बातमी पप्पांना सांगितली. कारण ते माझ्यासोबत इथेच राहत आहेत. त्यांच्याशिवाय मी ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. यानंतर मी मम्मीला आणि माझे कोच रोमी भिंडर सर यांना सांगितलं, जे नेहमी माझ्यासोबत असतात. पण सगळ्यात आधी पप्पांनाच सांगितलं. ही बातमी ऐकून पप्पा खूप खुश झाले आणि म्हणाले, “तू आतापर्यंत जसा खेळत आली आहेस तसाच खेळत रहा. कोणताही दबाव घेऊ नकोस आणि फक्त स्वतःच्या खेळावर विश्वास ठेव, असं वैभव सूर्यवंशी याने सांगितलं.

Maharashtra TimesINDvsENG : विजयाची पाटी कोरीच! कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 जणांना पराभवासाठी ठरवलं व्हिलन, कोणाची नावं घेतली?
‘ओल्ड ट्रॅफर्ड’ वर ही लढत झाली. भारताने इंग्लंडसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने १९व्या षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. यात जेकब बेथेलने ब्रूकसोबत २४ चेंडूंत ५० धावांची, बँटनसोबत ५० चेंडूंत ६७धावांची भागीदारी रचली. तसेच, सॅम करनसोबत त्याने १६ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या चार षटकात इंग्लंडला ४९ धावांची आवश्यकता होती. मात्र, सतराव्या षटकात इंग्लंडने २९ धावांची लूट केली. बिश्णोईच्या या षटकात जेकबने तीन षटकार लगावले; तसेच एक चौकार मारला.
Maharashtra TimesIND vs ENG 2nd T20 : इंग्लंडकडून भारताचा दुसऱ्या टी-20 मध्ये पराभव, 22 वर्षांच्या पोराने फिरवली संपूर्ण मॅच, सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांना षटकार लगावले. मात्र, पाचव्या षटकात विल जॅक्सच्या गोलंदाजीवर पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टीचीत झाला. मात्र, संथ सुरुवातीनंतर त्याने आणि अभिषेक शर्माने २९ चेंडूंत ५० धावांची सलामी दिली. पहिल्या दोन षटकांत दहाच धावा झाल्या होत्या. पॉवरप्लेमधील अखेरच्या चेंडूवर अभिषेकही परतला. त्यामुळे पहिल्या सहा षटकांअखेर भारताची २ बाद ६५ अशी स्थिती होती. त्यानंतर ईशान किशन, कर्णधार श्रेयस अय्यर, तिलक वर्मा यांनी दिलेल्या योगदानामुळे भारताने १९० धावा केल्या.

खेळ आकड्यांचा…

  • ४ एकाही एकाही फलंदाजाने ५० हून अधिक धावा न करताही भारतीय संघाने चौथ्यांदा १९० धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी, २०१९ मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध (२०८ धावा), २०२२मध्ये विंडीजविरुद्ध (१९१) आणि २०१७मध्ये विंडीजविरुद्धच (१९० धावा) अशी कामगिरी केली होती.
  • तिलक वर्माची जोफ्रा आर्चरविरुद्धची कामगिरी, २७३.१ तिलकने जोफ्राव्या २६ चेडूत २७३.१ च्या स्ट्राइक रेटने ७१ धावा केल्या आहेत. यात तीन चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश. जोफ्राच्या गोलंदाजीवर तो एकदा बाद झाला आहे.
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा