‘तुकाराम मुंढे’ हे नाव घेताच शिस्तप्रिय आणि आपल्या धडाकेबाज कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या मनात घर केलेल्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांसमोर उभी राहते. पुण्यात पार पडलेल्या एका मुलाखतीत लेखक अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढेंसाठी विशेष पत्र वाचून दाखवलं. तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम करणारं हे पत्र अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेलं.