Headlines

इंग्लंडच्या 388 धावांचा पाठलाग करताना भारताचा 27 धावांनी पराभव, रोहित-विराटची झुंजार खेळी व्यर्थ, अवघ्या 3 चेंडूत फिरला सामना


IND vs ENG 3rd ODI Match Turning Point : हरले पण वाघासारखे लढले! इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात ३८८ या डोंगराएवढा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३६० धावा करू शकला. भारत शेवटपर्यंत सामन्यात होता, परंतु तीन चेंडू जिथे सर्व सामना फिरला आणि इंग्लंडच्या बाजूने झुकला, जाणून घ्या.

IND vs ENG 3rd ODI
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : तिसरा वनडे सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा २७ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात इंग्लंडने ५० ओव्हरमध्य ३८७-३ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने आपली सर्व ताकद लावली पण भारताला ३६०-७ धावाच करता आल्या. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या सामन्यात रोहित शर्माचे तुफानी शतक आणि शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळी व्यर्थ गेल्या. या विजयासह इंग्लंडने ही मालिका २-१ ने खिशात घातली आहे.

टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. सलामीवीर बेन डकेटने १४१ धावांची तडाखेबंद खेळी केली. यासह तो लॉर्ड्सवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. डकेटने जेकब बेथलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १९२ धावांची विक्रमी भागीदारी रचली. बेथलने ९१ धावा केल्या. शेवटी जो रूटच्या ७४ आणि जोस बटलरच्या आक्रमक ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या १९ चेंडूत ६३ धावा फटकावल्या. भारतीय गोलंदाजीची मात्र निराशा झाली. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. गुरनूर ब्रारने तर १० ओव्हरमध्ये ९७ धावा खर्च केल्या. प्रिन्स यादव आणि कृष्णा यांच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. ३८८ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली होती.
Maharashtra TimesRohit Sharma : नाद करता काय! रोहित शर्माचे तुफानी शतक, लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर पठ्ठ्याने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची सलामी दिली. गिलने ८४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ७७ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला रोहितने दमदार कमबॅक करत ११० चेंडूत १३८ धावांची शतकी खेळी केली. हे त्याचे कारकिर्दीतील ३४ वे एकदिवसीय शतक होते. यासह रोहित लॉर्ड्सवर शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज ठरला. विराट कोहली ७४ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र भारताच्या डावाला ब्रेक लागला. इशान किशन १४ धावा, के.एल. राहुल १२ धावा आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. अखेर भारताने ५० ओव्हरमध्ये ३६०-७ धावा केल्या आणि सामना २७ धावांनी गमावला. भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे सामना गमवावा लागला.
Maharashtra TimesIND vs ENG 3rd ODI : IPL स्टार्सची मोक्कार धुलाई, इंग्लंडचे 388 धावांचे टार्गेट, लॉर्ड्सवर भारताचा लाजिरवाणा वर्ल्ड रेकॉर्ड

सामना कुठे फिरला?

भारता या सामन्यात ४० व्या ओव्हरपर्यंत सामन्यामध्ये होता. पण रोहित आऊट झाल्यावर मैदानात ईशान किशन आणि विराट कोहली होते, ४३ ओव्हरमध्ये भारताच्या ३०० धावा झाल्या होत्या, ४२ चेंडूत ८८ धावांची गरज होती आव्हान तसे तगडे होते, पण भारतीय बॅटिंग बाकी होती. परंतु ४४ व्या ओव्हरमध्ये सॅम करन याने इशान किशन आणि श्रेयस अय्यरला आऊट केले. पण तरी कोहली मैदानात असल्याने चाहत्यांना आशा होता. पण ४६ व्या ओव्हरमध्ये सॅमने विराट कोहलीला आऊट सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकला, हेच तीन चेंडू जिथे भारत हरला.